शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

राज्यात ४० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्राला वादळी पावसाचा फटका ; पंचनामे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 16:01 IST

केंद्र सरकारच्या निकषांनुसार नुकसान भरपाई द्यायची तर या बाधित क्षेत्रासाठी ३ हजार कोटी रूपये लागणार आहे.

ठळक मुद्देपंचनामे पूर्ण: अहवाल मंत्रिमंडळासमोर, निर्णयाची प्रतीक्षा

पुणे: राज्यातील ४० लाख ३७ हजार हेक्टरला वादळी पावसाचा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून राज्याचा एकत्रित अहवाल मदत व पुनर्वसन विभागाने मंत्री मंडळासमोर ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या निकषांनुसार नुकसान भरपाई द्यायची तर या बाधित क्षेत्रासाठी ३ हजार कोटी रूपये लागणार आहेत. केंद्र सरकारने ही मदत त्वरीत पाठवावी, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. केंद्राच्या निकषापेक्षा जास्त भरपाई द्यायची असेल तर नियमाप्रमाणे त्याची जबाबदारी राज्याला स्विकारावी लागणार आहे. कोणत्याही पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर ते भरपाईस पात्र समजले जाते. कितीही मोठ्या क्षेत्राचे नूकसान झाले असले तरी भरपाई फक्त २ हेक्टरसाठीच दिली जाते. 

सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झाले आहे. त्या खालोखाल कापूस व नंतर खरीपातील मूग वगैरे पिके नुकसानीत गेली आहेत.मराठवाड्यातील सोयाबीनचे नूकसान सर्वाधिक असून त्यानंतर कोकणात भातपीक व पश्चिम महाराष्ट्रात अन्य पिके वादळी पावसाने नूकसानीत गेली आहेत. केंद्र सरकारच्या वतीने बागायती साठी १३ हजार ५०० जिरायतीसाठी ६ हजार रूपये व फळपिकासाठी १८ हजार रूपये प्रती हेक्टरी दिले जातात. 

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी केलेल्या पाहणी दौऱ्यात बागायती, कोरडवाहूसाठी हेक्टरी १५ हजार व फळपिकासाठी २५ हजार रूपये देऊ असे सांगितले. मात्र अद्याप त्याचा अध्यादेश निघालेला नाही, अशी माहिती कृषी विभागातून मिळाली. तोपर्यंत केंद्राच्या निकषानुसार तरी भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पावसाने नुकसान केलेच आहे, दिवाळीपूर्वी मदत मिळाली तर दिवाळी तरी गोड जाईल अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार