शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

पाच साखर कारखान्यांना ४० कोटी रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 01:28 IST

साखर आयुक्तालयाचा गाळप परवाना न घेताच २०१७-१८च्या हंगामात ऊस गाळप करणाऱ्या ५ साखर कारखान्यांना तब्बल ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड साखर आयुक्तालयाने ठोठावला आहे.

पुणे : साखर आयुक्तालयाचा गाळप परवाना न घेताच २०१७-१८च्या हंगामात ऊस गाळप करणाऱ्या ५ साखर कारखान्यांना तब्बल ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड साखर आयुक्तालयाने ठोठावला आहे.शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व ऊस दर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार यांनी उसाची रास्त आणि किफायतशीर दाराची (एफआरपी) रक्कम शेतकºयांना न देणाºया कारखान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच त्यांनी न्यायालयात काही कारखान्यांनी विनागाळप परवाना ऊस गाळप हंगाम घेतल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची विचारणाही न्यायालयाने आयुक्तालयाकडे केली होती.त्यानुसार औरंगाबादच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यास ९.०४ कोटी, घृष्णेश्वर शुगरला ७.५७ कोटी, जळगावच्या चोपडा सहकारी साखर कारखान्यास १.७१, उस्मानाबादच्या शंभू महादेव शुगरला २.९५ आणि बीडच्या जयभवानी साखर कारखान्याला १८.४८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाने दिली.एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिल्याशिवाय गाळप परवाने देऊ नयेत असा आदेशही न्यायालयाने साखर आयुक्तालयाला दिला आहे. अजूनही शेतकºयांचे एफआरपीपोटी १०२ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती पवार यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने