शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

किटकजन्य आजाराने घेतले दोन वर्षात ३८१ बळी

By admin | Published: May 30, 2015 1:59 AM

वर्षभरात रुग्णसंख्येत वाढ : दोन वर्षात १ लाख ९७ हजार बाधित.

बुलडाणा : गत दोन वर्षांमध्ये किटकजन्य आजाराने राज्यभरात ३८१ रूग्णांना जीव गमवावा लागला. गतवर्षी किटकजन्य आजाराचे ८८ हजार रुग्ण राज्यात होते. यावर्षी रुग्णांची संख्या वाढून एक लाखाच्यावर गेली आहे. हिवताप, हत्तीरोग, मेंदुज्वर, डेंग्यूताप, चिकुनगुनीया, चंडिपुरा आदी किटकजन्य आजारांमुळे राज्यभरात दोन वर्षात ३८१ लोकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे २0१४ आणि २0१५ या दोन वर्षात किटकजन्य आजाराची लागण झालेले १ लाख ९७ हजार रुग्ण राज्यात आढळून आले असल्याची माहिती राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालातून पुढे आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किटकजन्य आजाराने शहरी भागासह ग्रामीण जनता त्रस्त होते. किटकजन्य आजारांमुळे निर्माण होणार्‍या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी शासन, स्थानिक आरोग्य प्रशासन यांच्या समन्वयातून पावसाळ्यापूर्वी जून ते ऑगस्टदरम्यान विशेष स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येतात; मात्र या योजना राबविणार्‍या स्थानिक आरोग्य यंत्रणेमध्ये अद्यापही बरीच पदे रिक्त आहे. याशिवाय आरोग्य योजनासाठी मिळणारा निधी अपुरा पडत असल्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेही किटकजन्य व विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे.

*डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक

         २0१४-१५ या वर्षात ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने राज्यभरात थैमान घातले होते. डेंग्यू पसरविणार्‍या एडिस एजिप्टाय डासाने संपूर्ण राज्याला डेंग्यूच्या विळख्यात ओढले आणि राज्यातील १२२ रुग्णाला मृत्यूच्या दारापयर्ंत नेऊन पोहोचवीले. ५८ हजार ५९४ नागरिक डेंग्यूने बाधीत झाले होते. तर २0१३-१४ या वर्षात डेंग्यूमुळे १२६ लोकांचा मृत्यू झाला,४१ हजार ६२२ लोक बाधीत झाले होते.