शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 00:22 IST

विमानसेवा रद्द झाल्याने उद्भवली समस्या

- अनिकेत घमंडीडोंबिवली: भारतातून इंडोनेशिया, बाली येथे पर्यटनासाठी गेलेले ३४ पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत. त्यामध्ये नाहुर येथील दिनेश पानसरे, किशोरी कडवे  हे दाम्पत्य अडकले आहे. १३ ते २० मार्च या कालावधीत त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. ते सगळे पर्यटक सुखरुप असून त्यापैकी कोणीही आजारी नसले तरी भारतात परत कसे जायचे या चिंतेत ते आहेत. नाहुर येथील रहिवासी दिनेश पानसरे यांनी ‘लोकमत’ ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्वतंत्रपणे ते पर्यटनासाठी गेले होते. कोणत्याही सहलींचे आयोजन करणा-या व्यावसायिकांमार्फत ते तेथे गेलेले नाहीत. मुंबई, जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे,  दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आदी राज्यांमधून पर्यटक तेथे गेले होते. या पर्यटकांपैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेल ग्रँडमस प्लसमध्ये वास्तव्याला असून अन्य काहीजण वेगवगेळया हॉटेलांमध्ये आहेत. पण आता त्यांच्याजवळील राखीव ठेवलेला पैसे संपत आले आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी किती दिवस तेथे रहायचे ही चिंता त्या सगळयांसमोर असून ते तणावाखाली आहेत. पानसरे म्हणाले की, त्यांनी मलेशियन एअरलाईन्सचे तिकिट काढले होते. नियोजनानूसार १३ मार्च रोजी ते तेथे विमानाने गेले, परत येण्यासाठी २० मार्च चे तिकिट होते, परंतू ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे पेच वाढला. तरीही त्यांनी सतर्कता दाखवत लगेच सुमारे ६५ हजार रुपये खर्च करुन एअर इंडियाचे २२ मार्च रोजीची दोन तिकिट काढली, मात्र तेदेखील रद्द झाले. आधीच भारतात परत कसे जायचे आणि विमान तिकिटांसाठी खर्च झालेले पैसे परत मिळतील की नाही? याचीही शाश्वती कोणालाही नाही, त्यामुळे ते अडकल्याच्या भावनेने महिला पर्यटकांना रडू कोसळले. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे आणखी किती दिवस बालीतच रहायचे? असा सवाल पर्यटकांनी केला. तसेच परत जाण्यासाठी पैसेदेखील नसल्याने आता विमानाच्या तिकिटसाठी लागणारी रक्कम कोण देणार ? तो कसा उभारणार ? असे प्रश्न त्यांना पडले असून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली. पानसरे यांचे सासरे भाऊसाहेब कडवे हे देखिल नाहुर येथे राहतात. त्यांनी पानसरेंना गुरुवारी ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवल्याचे सांगण्यात आले. अडकेल्या सर्व पर्यटकांना सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालावे अशी मागणी कडवे यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndonesiaइंडोनेशिया