शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

CoronaVirus: पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 00:22 IST

विमानसेवा रद्द झाल्याने उद्भवली समस्या

- अनिकेत घमंडीडोंबिवली: भारतातून इंडोनेशिया, बाली येथे पर्यटनासाठी गेलेले ३४ पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत. त्यामध्ये नाहुर येथील दिनेश पानसरे, किशोरी कडवे  हे दाम्पत्य अडकले आहे. १३ ते २० मार्च या कालावधीत त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. ते सगळे पर्यटक सुखरुप असून त्यापैकी कोणीही आजारी नसले तरी भारतात परत कसे जायचे या चिंतेत ते आहेत. नाहुर येथील रहिवासी दिनेश पानसरे यांनी ‘लोकमत’ ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्वतंत्रपणे ते पर्यटनासाठी गेले होते. कोणत्याही सहलींचे आयोजन करणा-या व्यावसायिकांमार्फत ते तेथे गेलेले नाहीत. मुंबई, जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे,  दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आदी राज्यांमधून पर्यटक तेथे गेले होते. या पर्यटकांपैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेल ग्रँडमस प्लसमध्ये वास्तव्याला असून अन्य काहीजण वेगवगेळया हॉटेलांमध्ये आहेत. पण आता त्यांच्याजवळील राखीव ठेवलेला पैसे संपत आले आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी किती दिवस तेथे रहायचे ही चिंता त्या सगळयांसमोर असून ते तणावाखाली आहेत. पानसरे म्हणाले की, त्यांनी मलेशियन एअरलाईन्सचे तिकिट काढले होते. नियोजनानूसार १३ मार्च रोजी ते तेथे विमानाने गेले, परत येण्यासाठी २० मार्च चे तिकिट होते, परंतू ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे पेच वाढला. तरीही त्यांनी सतर्कता दाखवत लगेच सुमारे ६५ हजार रुपये खर्च करुन एअर इंडियाचे २२ मार्च रोजीची दोन तिकिट काढली, मात्र तेदेखील रद्द झाले. आधीच भारतात परत कसे जायचे आणि विमान तिकिटांसाठी खर्च झालेले पैसे परत मिळतील की नाही? याचीही शाश्वती कोणालाही नाही, त्यामुळे ते अडकल्याच्या भावनेने महिला पर्यटकांना रडू कोसळले. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे आणखी किती दिवस बालीतच रहायचे? असा सवाल पर्यटकांनी केला. तसेच परत जाण्यासाठी पैसेदेखील नसल्याने आता विमानाच्या तिकिटसाठी लागणारी रक्कम कोण देणार ? तो कसा उभारणार ? असे प्रश्न त्यांना पडले असून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली. पानसरे यांचे सासरे भाऊसाहेब कडवे हे देखिल नाहुर येथे राहतात. त्यांनी पानसरेंना गुरुवारी ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवल्याचे सांगण्यात आले. अडकेल्या सर्व पर्यटकांना सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालावे अशी मागणी कडवे यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndonesiaइंडोनेशिया