शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

CoronaVirus: पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 00:22 IST

विमानसेवा रद्द झाल्याने उद्भवली समस्या

- अनिकेत घमंडीडोंबिवली: भारतातून इंडोनेशिया, बाली येथे पर्यटनासाठी गेलेले ३४ पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत. त्यामध्ये नाहुर येथील दिनेश पानसरे, किशोरी कडवे  हे दाम्पत्य अडकले आहे. १३ ते २० मार्च या कालावधीत त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. ते सगळे पर्यटक सुखरुप असून त्यापैकी कोणीही आजारी नसले तरी भारतात परत कसे जायचे या चिंतेत ते आहेत. नाहुर येथील रहिवासी दिनेश पानसरे यांनी ‘लोकमत’ ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्वतंत्रपणे ते पर्यटनासाठी गेले होते. कोणत्याही सहलींचे आयोजन करणा-या व्यावसायिकांमार्फत ते तेथे गेलेले नाहीत. मुंबई, जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे,  दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आदी राज्यांमधून पर्यटक तेथे गेले होते. या पर्यटकांपैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेल ग्रँडमस प्लसमध्ये वास्तव्याला असून अन्य काहीजण वेगवगेळया हॉटेलांमध्ये आहेत. पण आता त्यांच्याजवळील राखीव ठेवलेला पैसे संपत आले आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी किती दिवस तेथे रहायचे ही चिंता त्या सगळयांसमोर असून ते तणावाखाली आहेत. पानसरे म्हणाले की, त्यांनी मलेशियन एअरलाईन्सचे तिकिट काढले होते. नियोजनानूसार १३ मार्च रोजी ते तेथे विमानाने गेले, परत येण्यासाठी २० मार्च चे तिकिट होते, परंतू ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे पेच वाढला. तरीही त्यांनी सतर्कता दाखवत लगेच सुमारे ६५ हजार रुपये खर्च करुन एअर इंडियाचे २२ मार्च रोजीची दोन तिकिट काढली, मात्र तेदेखील रद्द झाले. आधीच भारतात परत कसे जायचे आणि विमान तिकिटांसाठी खर्च झालेले पैसे परत मिळतील की नाही? याचीही शाश्वती कोणालाही नाही, त्यामुळे ते अडकल्याच्या भावनेने महिला पर्यटकांना रडू कोसळले. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे आणखी किती दिवस बालीतच रहायचे? असा सवाल पर्यटकांनी केला. तसेच परत जाण्यासाठी पैसेदेखील नसल्याने आता विमानाच्या तिकिटसाठी लागणारी रक्कम कोण देणार ? तो कसा उभारणार ? असे प्रश्न त्यांना पडले असून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली. पानसरे यांचे सासरे भाऊसाहेब कडवे हे देखिल नाहुर येथे राहतात. त्यांनी पानसरेंना गुरुवारी ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवल्याचे सांगण्यात आले. अडकेल्या सर्व पर्यटकांना सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालावे अशी मागणी कडवे यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndonesiaइंडोनेशिया