शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मुख्यमंत्रिपदावरून ‘मविआ’त ३ पक्षांची ३ मते; शरद पवार म्हणाले, आम्हाला स्वारस्य नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 08:53 IST

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना, चार भिंतींच्या आड तरी ‘मविआ’ने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरविण्याच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतभिन्नता दिसून आली आहे. तीन पक्षांची तीन वेगवेगळी मते समोर आली आहेत.  उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना, चार भिंतींच्या आड तरी ‘मविआ’ने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा.

ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्या पक्षाला मुख्यमंत्रिपद हा फॉर्म्युला ठरवू नये; कारण त्यामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातात, कोणताही चेहरा ‘मविआ’ने ठरवावा, आपण पाठिंबा देऊ, असे म्हटले होते. त्यावर शुक्रवारी शरद पवार यांनी सध्याच्या सरकारला पर्याय कसा देता येईल, यालाच महत्त्व द्यायला हवे, आधी सत्तापरिवर्तन, असे म्हटले.

ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पवार करणार नाहीत : बावनकुळेमुख्यमंत्री होता यावे यासाठी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीची साथ सोडू शकतात; तर ते आपल्याही पाठीत केव्हाही खंजीर खुपसू शकतात, हे शरद पवार यांना  माहिती आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची कधीही चूक करणार नाहीत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केला. उद्धव ठाकरे हे काँग्रेस व शरद पवार गटाच्या जाळ्यात फसले आहेत. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून आहेत. सोबतच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा मनसुबा आहे. यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी याचना करीत आहेत.  उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्या नावावर जसा खोटारडेपणा केला, तसाच खोटारडेपणा ते शरद पवारांच्या नावाने करतील. मुख्यमंत्रिपद मिळविण्याकरिता उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते; पण त्यांना तेथून पिटाळून लावले, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी निर्णय घेतीलकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकमध्ये म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ हाच चेहरा बनून जनतेसमोर जाऊ.नागरिकांनी ‘मविआ’ला सत्ता दिल्यास तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील. चार भिंतींत तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, असा कोणताही विषयच चर्चिला गेलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्ता परिवर्तन महत्त्वाचेज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,  निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात आमच्या पक्षाला स्वारस्य नाही, सत्ता परिवर्तन होणे हे मला महत्त्वाचे वाटते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार