शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

कृषी विभाग घेणार ३ लाख शेतकऱ्यांची शाळा             

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 8:46 PM

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांची मशागतपूर्व, लागवडीनंतर व वाढीदरम्यान काळजी कशी घ्यावी, शेतमालाचे प्रतवारीकरण, पॅकेजिंग कसे असावे या विषयी राज्यातील तब्बल ३ लाख शेतकऱ्यांची कृषी विभाग शाळा घेणार आहे.

पुणे : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांची मशागतपूर्व, लागवडीनंतर व वाढीदरम्यान काळजी कशी घ्यावी, शेतमालाचे प्रतवारीकरण, पॅकेजिंग कसे असावे या विषयी राज्यातील तब्बल ३ लाख शेतकऱ्यांची कृषी विभाग शाळा घेणार आहे. सोयाबीन, भात, कापूस, तूर, मका, ज्वारी व हरभरा या पिकांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. 

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साखर संकुल येथे कृषी विभागाची आढावा बैठक झाली. त्यात शेतकरी शेती शाळेचे नियोजन केले. राज्यातील १२ हजार गावांमध्ये येत्या खरीप हंगामापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या गावांमधील प्रत्येकी २५ शेतकऱ्यांची या उपक्रमा अंतर्गत निवड करण्यात येईल. त्यात प्रयोगशील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागा अंतर्गत असलेले सर्व उपविभाग एकत्रित येऊन एक मोहीम म्हणून ही योजना राबविणार आहेत. 

कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतकरी शेतीशाळा घेण्यात येईल. पेरणीपूर्व घ्यायची दक्षता, जमीनीची मशागत, बियाणांची निवड, लागवड कालावधी, जमिनीच्या सुपिकता निर्देशांका प्रमाणे खतांचा वापर, पिकाची वाढीची अवस्था, कीड रोग नियंत्रण व्यवस्थापन याची माहिती दिली जाईल. या शिवाय शेतमालाचे , पॅकेजिंग याबाबतही शेतकºयांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या शेतकºयांनी आपल्या गावातील इतर शेतकºयांना प्रशिक्षित करणे अपेक्षित आहे. 

या मोहीमेसाठी राज्य आणि विभागस्तरावर समन्वयकांची नेमणूक केली असून, त्यांना २ हजार क्षेत्रिय अधिकारी आणि कर्मचारी व राज्यातील २० हजार शेतकरी मित्र मदत करतील. तसेच, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व पुरस्कार प्राप्त शेतकºयांचाही यात सहभाग असणार आहे. विकास शेती शाळेच्या प्रशिक्षण, प्रसिद्धीसाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीEducationशिक्षण