शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विम्याचे पैसे मिळविण्यासाठी २५६ शेतकऱ्यांकडून शासनाची फसवणूक, रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:10 IST

काहींनी पिकासह शेतकरी नसलेल्या जागेचा काढला विमा

रत्नागिरी : विम्याचे पैसे मिळविण्यासाठी कोणी कलमांची संख्या अधिक दाखवली, कोणी कमी वयाच्या झाडांचाही योजनेत समावेश करण्याचा प्रयत्न केला, काहींनी पीकच नसताना विमा काढला आणि दोन शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्यामध्ये तशी जमीन तर नाहीच; पण ज्या नावाने विमा काढला होता, ते शेतकरी अस्तित्वात नाहीत. हे सर्व धक्कादायक प्रकार घडले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात. तब्बल २५६ शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बोगस काम करून पीक विमा काढला असल्याचे कृषी खात्याने केलेल्या तपासणीतून पुढे आले आहे. या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत टाकले जाणार आहे.२०२५ च्या अंबिया बहार फळपीक विमा योजनेंतर्गत ही शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. ही रक्कम अजून अदा झालेली नाही. आलेल्या प्रस्तावांची छाननी कृषी खात्याकडून सुरू असताना हा बोगस प्रकार उघड झाला आहे. तब्बल ९४.७२ हेक्टर क्षेत्रावर असा बोगस विमा काढल्याचे निदर्शनास आले आहे.फळपीक विमा योजनेचा परतावा मिळविण्यासाठी काही बागायतदारांनी फसवणूक केली आहे, त्यासाठी विविध क्लृप्त्यांचा वापर केला आहे. कृषी खात्याने बागायतदारांच्या प्रस्तावांची तपासणी केली असता, त्यांना बोगस विमा काढल्याचे आढळले आहे. जिल्ह्यातील ३६ हजार ४६६ बागायतदारांनी १८ हजार १९.३६ हेक्टर क्षेत्राचा फळपीक विमा काढला होता. त्यातील २५६ शेतकऱ्यांनी फसवणूक करत ९४.७२ हेक्टर क्षेत्र बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे.