शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

२३ मतदारसंघांमध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे महाआघाडीला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 01:11 IST

राज्यातील एकूण १२० मतदारसंघांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त केली आहेत

अकोला : राज्यातील २३ विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेली मते, विजयी उमेदवारांनी पराभूत काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर मिळविलेल्या मताधिक्यापेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकूण २३ मतदारसंघांमध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे महाआघाडीला पराभवाचा धक्का दिल्याचा ढोबळ निष्कर्ष काढता येऊ शकतो. निवडणूक निकालापूर्वी विजयाचे दावे केलेल्या वंचित बहुजन आघाडीला मात्र एकाही मतदारसंघात विजय प्राप्त करता आलेला नाही.

राज्यातील एकूण १२० मतदारसंघांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त केली आहेत. त्यापैकी एका मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे, तर उर्वरित ११९ मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष अथवा शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला. त्या १२० मतदारसंघांपैकी ११५ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते.

‘वंचित’चे उमेदवार रिंगणात नसते तर त्यांनी घेतलेली सगळी मते काँग्रेस अथवा राष्ट्रवादी उमेदवारांच्याच पारड्यात गेली असती, असे छातीठोकपणे म्हणता येत नसले तरी, आघाडीच्या कट्टर पाठीराख्यांप्रमाणेच ‘वंचित’चे पाठीराखेही भाजप व शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या विरोधात असल्याने, ढोबळमानाने ‘वंचित’च्या उमेदवारांचा फटका आघाडीलाच बसल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो.‘वंचित’मुळे आघाडीला फटका बसलेले २३ मतदारसंघ विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच भागातील आहेत. मुंबई, पुणे व नागपूर या महानगरांमधील काही मतदारसंघांमध्येही ‘वंचित’च्या उमेदवारांनी आघाडीच्या उमेदवारांना हिसका दाखवला. कोकण विभागात मात्र ‘वंचित’ला तसा करिश्मा दाखविता आलेला नाही.

‘वंचित’मुळे आघाडीला फटका बसलेल्या मतदारसंघांमध्ये विदर्भातील अकोला पश्चिम, आर्णी, बल्लारपूर, चिखली, चिमूर, धामणगाव रेल्वे, खामगाव, दक्षिण नागपूर व यवतमाळ, मराठवाड्यातील गेवराई, जिंतूर, उत्तर नांदेड, उस्मानाबाद, पैठण व तुळजापूर, पश्चिम महाराष्ट्रातील दौंड, माळशिरस, पुणे कॅन्टोनमेंट व शिवाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव आणि मुंबई महानगर क्षेत्रातील उल्हासनगर, चांदिवली व चेंबूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

‘वंचित’च्या उमेदवारांनी १५ मतदारसंघांमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त मते घेतली. त्यामध्ये अकोला पूर्व, बाळापूर, मूर्तिजापूर, रिसोड, वाशिम, अकोट, सिंदखेड राजा, बुलडाणा, चाळीसगाव, साकोली, बल्लारपूर, लोहा, कळमनुरी, तुळजापूर व चांदगड या मतदारसंघांचा समावेश आहे. त्याशिवाय आणखी २० मतदारसंघांमध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांना २० हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. ‘वंचित’ने पाच आकडी मते मिळविलेल्या मतदारसंघांची एकूण संख्या ७४ एवढी आहे.आघाडी विजयापासून ‘वंचित’मताधिक्य मते१. अकोला पश्चिम २५९३ २०६८७२. आर्णी ३१५३ १२३०७३. बल्लारपूर ३३२४० ३९९५८४. चाळीसगाव ४२८७ ३८४२९५. चांदिवली ४०९ ८८७६६. चेंबूर १९०१८ २३१७८७. चिखली ६८१० ९६६१८. चिमूर ९७५२ २४४७४९. दौंड ७४६ २६३३१०. धामणगाव रेल्वे ९५१९ २३७७९११. गेवराई ६७९२ ८३०६१२. जिंतूर ३७१७ १३१७२१३. खामगाव १६९६८ २५९५७१४. माळशिरस २५९० ५५३८१५. दक्षिण नागपूर ४०१३ ५५८३१६. उत्तर नांदेड १२१०६ २६५६९१७. उस्मानाबाद १३४६७ १५७५५१८. पैठण १४१३९ २०६५४१९. पुणे कॅन्टोनमेंट ५०१२ १००२६२०. शिवाजीनगर ५१२४ १०४५४२१. तुळजापूर २३१६९ ३५३८३२२. उल्हासनगर २००४ ५६८९२३. यवतमाळ २२५३ ७९३०

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस