शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

२२ साखर कारखान्यांना मदत

By admin | Updated: August 26, 2015 01:17 IST

गेल्या हंगामात गाळप करून ५० टक्क्यांपेक्षा जास्त रास्त व किफायतशीर मूल्य (एफआरपी) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र एनपीएमुळे केंद्र सरकारच्या निकषात

मुंबई : गेल्या हंगामात गाळप करून ५० टक्क्यांपेक्षा जास्त रास्त व किफायतशीर मूल्य (एफआरपी) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र एनपीएमुळे केंद्र सरकारच्या निकषात न बसणाऱ्या २२ साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम चुकती करण्याकरिता राज्य सरकारने सॉफ्ट लोन देण्याची योजना राबवण्यासाठी १८७ कोटी ७६ लाख रुपये उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. मात्र याकरिता साखर कारखान्यांबरोबरच संचालकांची मालमत्ता तारण ठेवण्याची अट असल्याने या योजनेला किती प्रतिसाद लाभेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.राज्यातील काही साखर कारखान्यांनी फक्त २०१४-१५ या वर्षाचा गाळप हंगाम घेतलेला आहे. तसेच एफआरपीची ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ३० जून २०१५ पर्यंत दिलेली आहे. अशा साखर कारखान्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देता यावी यासाठी राज्य शासनामार्फत ही सॉफ्ट लोन योजना राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या योजनेत नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट झाल्याने हे कारखाने सामील होऊ शकले नव्हते. अशा एनपीएतील कारखान्यांना संचालक मंडळाच्या जबाबदारीवर शासन हमी देण्यात येईल. कर्जाच्या मुद्दलाची रक्कम वेळेवर न भरणाऱ्या कारखान्यांना योजनेतून तात्काळ वगळण्यात येणार आहे. सॉफ्ट लोन योजनेतील कारखान्यांना १० टक्के सरळ व्याज किंवा बँकेकडून आकारण्यात येणारा व्याजदर यामधील कमी असलेल्या व्याजदरानुसार पाच वर्षांचा रिड्यूसिंग बॅलन्सनुसार व्याजाची रक्कम राज्य शासन अनुदान स्वरुपात देणार आहे. या साखर कारखान्यांना १८७ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल्याने त्यावरील व्याजापोटी राज्य सरकारवर ५६ कोटी ३३ लाख रुपयांचा भार पडणार आहे. हमीपत्र देण्यास कारखाने अनुत्सुकराज्य सरकारच्या योजनेनुसार सॉफ्ट लोन घेणाऱ्या साखर कारखान्यांना कारखान्याची व संचालकांची मालमत्ता तारण ठेवण्याबाबत हमीपत्र द्यावे लागते. त्याला संचालकांचा तीव्र विरोध आहे. तसेच यापूर्वी ही कर्जाची रक्कम कारखान्याच्या बँक खात्यात जमा होत होती. आता ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळणे बाकी आहे त्यांची बँक खाती आधार कार्डाशी जोडलेली असल्यास त्या खात्यात रक्कम जमा होते. मात्र कर्जाचे दायित्व कारखान्यावर येते. त्यामुळे अनेक कारखाने हे सॉफ्ट लोन घेण्यास अनुत्सुक आहेत.योजनेस पात्र कारखानेसरसेनापती संताजी घोरपडे (कागल), ग्रीन पॉवर शुगर (खटाव), लोकनेते बाबुराव पाटील अ‍ॅग्रो इंडस्ट्री (कोल्हापूर), युरोपियन शुगर, भैरवनाथ शुगर, शंकरराव उद्योग ,बबनराव शिंदे शुगर मिल (सोलापूर), गणेश सहकारी (विठ्ठलराव विखे) साखर कारखाना, साईकृपा शुगर, पियुष साखर कारखाना (अहमदनगर), संत मुक्ताई (जळगाव), समर्थ सहकारी साखर कारखाना, वागेश्वर (जालना), जयभवानी, छत्रपती सहकारी साखर कारखाना (बीड), बळीराजा, रत्नप्रभा (परभणी), कुंटुरकर शुगर (नांदेड), कांचेश्वर (उस्मानाबाद), प्रियदर्शिनी (लातूर), संत एकनाथ (औरंगाबाद).