शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

२२ साखर कारखान्यांना मदत

By admin | Updated: August 26, 2015 01:17 IST

गेल्या हंगामात गाळप करून ५० टक्क्यांपेक्षा जास्त रास्त व किफायतशीर मूल्य (एफआरपी) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र एनपीएमुळे केंद्र सरकारच्या निकषात

मुंबई : गेल्या हंगामात गाळप करून ५० टक्क्यांपेक्षा जास्त रास्त व किफायतशीर मूल्य (एफआरपी) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र एनपीएमुळे केंद्र सरकारच्या निकषात न बसणाऱ्या २२ साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम चुकती करण्याकरिता राज्य सरकारने सॉफ्ट लोन देण्याची योजना राबवण्यासाठी १८७ कोटी ७६ लाख रुपये उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. मात्र याकरिता साखर कारखान्यांबरोबरच संचालकांची मालमत्ता तारण ठेवण्याची अट असल्याने या योजनेला किती प्रतिसाद लाभेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.राज्यातील काही साखर कारखान्यांनी फक्त २०१४-१५ या वर्षाचा गाळप हंगाम घेतलेला आहे. तसेच एफआरपीची ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ३० जून २०१५ पर्यंत दिलेली आहे. अशा साखर कारखान्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देता यावी यासाठी राज्य शासनामार्फत ही सॉफ्ट लोन योजना राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या योजनेत नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट झाल्याने हे कारखाने सामील होऊ शकले नव्हते. अशा एनपीएतील कारखान्यांना संचालक मंडळाच्या जबाबदारीवर शासन हमी देण्यात येईल. कर्जाच्या मुद्दलाची रक्कम वेळेवर न भरणाऱ्या कारखान्यांना योजनेतून तात्काळ वगळण्यात येणार आहे. सॉफ्ट लोन योजनेतील कारखान्यांना १० टक्के सरळ व्याज किंवा बँकेकडून आकारण्यात येणारा व्याजदर यामधील कमी असलेल्या व्याजदरानुसार पाच वर्षांचा रिड्यूसिंग बॅलन्सनुसार व्याजाची रक्कम राज्य शासन अनुदान स्वरुपात देणार आहे. या साखर कारखान्यांना १८७ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल्याने त्यावरील व्याजापोटी राज्य सरकारवर ५६ कोटी ३३ लाख रुपयांचा भार पडणार आहे. हमीपत्र देण्यास कारखाने अनुत्सुकराज्य सरकारच्या योजनेनुसार सॉफ्ट लोन घेणाऱ्या साखर कारखान्यांना कारखान्याची व संचालकांची मालमत्ता तारण ठेवण्याबाबत हमीपत्र द्यावे लागते. त्याला संचालकांचा तीव्र विरोध आहे. तसेच यापूर्वी ही कर्जाची रक्कम कारखान्याच्या बँक खात्यात जमा होत होती. आता ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळणे बाकी आहे त्यांची बँक खाती आधार कार्डाशी जोडलेली असल्यास त्या खात्यात रक्कम जमा होते. मात्र कर्जाचे दायित्व कारखान्यावर येते. त्यामुळे अनेक कारखाने हे सॉफ्ट लोन घेण्यास अनुत्सुक आहेत.योजनेस पात्र कारखानेसरसेनापती संताजी घोरपडे (कागल), ग्रीन पॉवर शुगर (खटाव), लोकनेते बाबुराव पाटील अ‍ॅग्रो इंडस्ट्री (कोल्हापूर), युरोपियन शुगर, भैरवनाथ शुगर, शंकरराव उद्योग ,बबनराव शिंदे शुगर मिल (सोलापूर), गणेश सहकारी (विठ्ठलराव विखे) साखर कारखाना, साईकृपा शुगर, पियुष साखर कारखाना (अहमदनगर), संत मुक्ताई (जळगाव), समर्थ सहकारी साखर कारखाना, वागेश्वर (जालना), जयभवानी, छत्रपती सहकारी साखर कारखाना (बीड), बळीराजा, रत्नप्रभा (परभणी), कुंटुरकर शुगर (नांदेड), कांचेश्वर (उस्मानाबाद), प्रियदर्शिनी (लातूर), संत एकनाथ (औरंगाबाद).