शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

अकरावीच्या विशेष फेरीत १५ हजार अर्ज

By admin | Updated: August 20, 2016 02:10 IST

अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्यास शुक्रवारी, १९ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १५ हजार १४ विद्यार्थ्यांनी

मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्यास शुक्रवारी, १९ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १५ हजार १४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म) भरल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. त्यामुळे अद्यापही हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदल अपेक्षित असल्याचे स्पष्ट होते.अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीसाठी ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यामुळे एकूण ७ हजार ६६७ विद्यार्थी दुसऱ्या विशेष फेरीत अर्ज करण्याची शक्यता निर्माण झाली होती. याशिवाय ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी पहिल्या विशेष फेरीअखेर महाविद्यालय बदल केला होता. त्यामुळे एकूण १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयाने दिलेला पर्याय नाकारला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी आलेले प्रवेश अर्ज आणि पहिल्या विशेष फेरीतील नाखुश विद्यार्थ्यांची तुलना केल्यास सुमारे २० हजारांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे. अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख शनिवारी आहे. मंगळवारी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. तरी महाविद्यालय, शाखा किंवा विषयबदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनिवारपर्यंत प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २८४ विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रवेश अर्ज भरला होता, मात्र तो कन्फर्म केला नव्हता. तर ३ हजार २०४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून कन्फर्म केले होते. ६६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून कन्फर्म केल्यानंतर पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरला होता. तर एकूण १५ हजार ०१४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज कन्फर्म केला होता.