शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

अकरावीच्या विशेष फेरीत १५ हजार अर्ज

By admin | Updated: August 20, 2016 02:10 IST

अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्यास शुक्रवारी, १९ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १५ हजार १४ विद्यार्थ्यांनी

मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्यास शुक्रवारी, १९ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १५ हजार १४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म) भरल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. त्यामुळे अद्यापही हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदल अपेक्षित असल्याचे स्पष्ट होते.अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीसाठी ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यामुळे एकूण ७ हजार ६६७ विद्यार्थी दुसऱ्या विशेष फेरीत अर्ज करण्याची शक्यता निर्माण झाली होती. याशिवाय ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी पहिल्या विशेष फेरीअखेर महाविद्यालय बदल केला होता. त्यामुळे एकूण १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयाने दिलेला पर्याय नाकारला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी आलेले प्रवेश अर्ज आणि पहिल्या विशेष फेरीतील नाखुश विद्यार्थ्यांची तुलना केल्यास सुमारे २० हजारांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे. अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख शनिवारी आहे. मंगळवारी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. तरी महाविद्यालय, शाखा किंवा विषयबदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनिवारपर्यंत प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २८४ विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रवेश अर्ज भरला होता, मात्र तो कन्फर्म केला नव्हता. तर ३ हजार २०४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून कन्फर्म केले होते. ६६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून कन्फर्म केल्यानंतर पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरला होता. तर एकूण १५ हजार ०१४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज कन्फर्म केला होता.