शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

अकरावीच्या विशेष फेरीत १५ हजार अर्ज

By admin | Updated: August 20, 2016 02:10 IST

अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्यास शुक्रवारी, १९ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १५ हजार १४ विद्यार्थ्यांनी

मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्यास शुक्रवारी, १९ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १५ हजार १४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म) भरल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. त्यामुळे अद्यापही हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदल अपेक्षित असल्याचे स्पष्ट होते.अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीसाठी ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यामुळे एकूण ७ हजार ६६७ विद्यार्थी दुसऱ्या विशेष फेरीत अर्ज करण्याची शक्यता निर्माण झाली होती. याशिवाय ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी पहिल्या विशेष फेरीअखेर महाविद्यालय बदल केला होता. त्यामुळे एकूण १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयाने दिलेला पर्याय नाकारला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी आलेले प्रवेश अर्ज आणि पहिल्या विशेष फेरीतील नाखुश विद्यार्थ्यांची तुलना केल्यास सुमारे २० हजारांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे. अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख शनिवारी आहे. मंगळवारी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. तरी महाविद्यालय, शाखा किंवा विषयबदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनिवारपर्यंत प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २८४ विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रवेश अर्ज भरला होता, मात्र तो कन्फर्म केला नव्हता. तर ३ हजार २०४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून कन्फर्म केले होते. ६६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून कन्फर्म केल्यानंतर पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरला होता. तर एकूण १५ हजार ०१४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज कन्फर्म केला होता.