शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरतीला १३ संस्थांची संमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 12:32 IST

चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांच्या सर्व जागांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.मात्र, खासगी संस्थाचालकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.

ठळक मुद्देमुलाखतीशिवाय भरणार १२४१ जागा : पात्रताधारक उमेदवारांकडून स्वागत

पुणे : पवित्र पोर्टलद्वारे राज्यभरात शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये अभियोग्यता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखत न घेता शिक्षक पदावर नियुक्ती करण्यास १३ संस्थांनी संमती दिली आहे. या संस्थांच्या १ हजार २४१ शिक्षकांच्या जागा आता थेट गुणवत्तेच्या आधारे भरल्या जाणार आहेत. यामुळे पात्रधारक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्य शासनाने गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती व्हावी यासाठी पात्रताधारक उमेदवारांची अभियोग्यता चाचणी घेतली. या चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांच्या सर्व जागांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.मात्र, खासगी संस्थाचालकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे संस्थाचालकांना एका जागेसाठी दहा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास शासनाकडून संमती देण्यात आली.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागांच्या सर्व जागा या मुलाखत न घेता थेट गुणवत्तेच्या आधारावरच घेतल्या जाणार आहेत. मात्र केवळ अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न निर्माण झाला होता. खाजगी संस्थांकडून एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जाईल. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असेल. त्याचबरोबर या मुलाखतींमध्ये दहा जणांमधील अभियोग्यता चाचणीत कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची निवड झाल्यास, त्या निवडीवरून शंका, न्यायालयात याचिका असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी संस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे मुलाखत न घेता शिक्षक भरती प्रक्रिया करावी असे प्रयत्न शिक्षण आयुक्त कार्यालयातून करण्यात आले. यास यश आले असून आतापर्यंत १३ संस्थांनी याला मान्यता दिली असून त्यांच्या १ हजार २४१ जागा केवळ गुणवत्तेच्या आधारावर भरल्या जाणार आहेत.पवित्र पोर्टलकडे १ लाख २३ हजार डी.टीएड., बी.एड. पात्रताधारक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार, पात्रतेनुसार शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे. या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदविण्यासाटी मुभा देण्यात येणार आहे. उमेदवारांची प्रोफाइल अपडेट करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून त्यांनी आता अर्ज स्वप्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. अर्ज स्वप्रमाणित केल्याशिवाय त्यांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही असे पवित्र पोर्टलवर नमूद करण्यात आले आहे.  ..........उच्च न्यायालयातील याचिकेमुळे भरती प्रक्रिया थांबलीइंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव ठेवाव्यात व बी.एड. उमेदवारांना प्राथमिकच्या वगार्ना शिकविता देता यावे यासाठी दोन याचिका दाखल झाल्या आहेत. इंग्रजीच्या याचिकेवर २९ एप्रिलला तर बी.एड.च्या याचिकोवर १५ एप्रिलला सुनावणी आहे. त्यानंतर भरती प्रक्रिया पुढे सुरू केली जाणार आहे.........इतर संस्थांनीही अनुकरण करावेराज्यातील १३ संस्थांनी शिक्षक भरतीच्या जागा मुलाखत न घेता थेट अभियोग्यता चाचणीच्या गुणांवर भरण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. इतर संस्थांनीही याचे अनुकरण केल्यास शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता येईल. त्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने त्या त्या जिल्हयातील संस्थाचालकांना निवेदन देणार आहोत.-संतोष मगर, राज्य अध्यक्ष, डि.टीएड, बी.एड. पात्रताधारक संघटना

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकState Governmentराज्य सरकारEducationशिक्षण