शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वनसंरक्षणासाठी राज्यात १२ हजार ५१७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 14:25 IST

राज्यात वनक्षेत्रालगत १५ हजार ५०० गावे येतात. त्यापैकी १२ हजार ५१७ गावांमंध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना झाली असून वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ४५ टक्के वनक्षेत्रात संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत संरक्षणाची कामे केली जात आहेत.

मुंबई -  राज्यात वनक्षेत्रालगत १५ हजार ५०० गावे येतात. त्यापैकी १२ हजार ५१७ गावांमंध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना झाली असून वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ४५ टक्के वनक्षेत्रात संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत संरक्षणाची कामे केली जात आहेत.

या समित्यांकडे ३४,५२,६४९.८१४ हेक्टर वनक्षेत्र वर्ग करण्यात आले आहे . औरंगाबाद,  ठाणे,  नागपूर,  पुणे,  चंद्रपूर,  गडचिरोली,  यवतमाळ,  धुळे, कोल्हापूर,  नाशिक, अमरावती या वनवृत्तांमध्ये समित्या कार्यरत आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमासाठी सन २०१८-१९ या वर्षात ५४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून वन संरक्षण आणि वनसंवर्धनाच्या कामात गावकऱ्यांचा सहभाग प्राप्त करणे तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमध्ये चूरस निर्माण करून समित्यांना जास्तीत जास्त चांगली कामे करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे “संत तुकाराम वन ग्राम योजने” अंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. या योजनेतील राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण  नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत करण्यात आले.  औरंगाबाद वनवृत्तातील लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील  लांबोटा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस तसेच नाशिक वनवृत्तातील त्र्यंबक तालुक्यातील काचुर्ली संयुक्त वनव्यवस्थापन समितीस १० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले तर इतर राज्यस्तरीय पुरस्काराचेही यावेळी वितरण करण्यात आले.

संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये यंत्रणा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमाला मिळत असलेले यश पाहून या कार्यक्रमात चांगल्या घनदाट वनांचाही (०.४ पेक्षा अधिक घनता असलेली वने) समावेश करण्यात आला आहे. वनालगतच्या गावांमध्ये एलपीजी गॅस जोडणी, बायोगॅस तसेच दुभती जनावरे यांचे वितरण या कामात देखील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचा सहभाग घेण्यात आला आहे. विकासासाठी वनविभागाची जागा देण्याचे आव्हान असतांना राज्याच्या वनक्षेत्रात विविध सेक्टरनिहाय होत असलेली वाढ उल्लेखनीय असून यातून वाढत्या लोकसहभागाचे आणि संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या कामाचे महत्व अधोरेखित होते असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. “वने आणि शाश्वत शहरे” हे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय वन दिनाचे घोषवाक्य आहे. शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढते आहे, दाटीवाटीच्या घरांनी श्वास कोंडतो आहे, हे टाळायचे असेल तर “फॅमिली फॉरेस्ट” ही संकल्पना प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज वनमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :forestजंगलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार