शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

वनसंरक्षणासाठी राज्यात १२ हजार ५१७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 14:25 IST

राज्यात वनक्षेत्रालगत १५ हजार ५०० गावे येतात. त्यापैकी १२ हजार ५१७ गावांमंध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना झाली असून वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ४५ टक्के वनक्षेत्रात संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत संरक्षणाची कामे केली जात आहेत.

मुंबई -  राज्यात वनक्षेत्रालगत १५ हजार ५०० गावे येतात. त्यापैकी १२ हजार ५१७ गावांमंध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना झाली असून वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ४५ टक्के वनक्षेत्रात संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत संरक्षणाची कामे केली जात आहेत.

या समित्यांकडे ३४,५२,६४९.८१४ हेक्टर वनक्षेत्र वर्ग करण्यात आले आहे . औरंगाबाद,  ठाणे,  नागपूर,  पुणे,  चंद्रपूर,  गडचिरोली,  यवतमाळ,  धुळे, कोल्हापूर,  नाशिक, अमरावती या वनवृत्तांमध्ये समित्या कार्यरत आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमासाठी सन २०१८-१९ या वर्षात ५४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून वन संरक्षण आणि वनसंवर्धनाच्या कामात गावकऱ्यांचा सहभाग प्राप्त करणे तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमध्ये चूरस निर्माण करून समित्यांना जास्तीत जास्त चांगली कामे करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे “संत तुकाराम वन ग्राम योजने” अंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. या योजनेतील राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण  नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत करण्यात आले.  औरंगाबाद वनवृत्तातील लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील  लांबोटा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस तसेच नाशिक वनवृत्तातील त्र्यंबक तालुक्यातील काचुर्ली संयुक्त वनव्यवस्थापन समितीस १० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले तर इतर राज्यस्तरीय पुरस्काराचेही यावेळी वितरण करण्यात आले.

संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये यंत्रणा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमाला मिळत असलेले यश पाहून या कार्यक्रमात चांगल्या घनदाट वनांचाही (०.४ पेक्षा अधिक घनता असलेली वने) समावेश करण्यात आला आहे. वनालगतच्या गावांमध्ये एलपीजी गॅस जोडणी, बायोगॅस तसेच दुभती जनावरे यांचे वितरण या कामात देखील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचा सहभाग घेण्यात आला आहे. विकासासाठी वनविभागाची जागा देण्याचे आव्हान असतांना राज्याच्या वनक्षेत्रात विविध सेक्टरनिहाय होत असलेली वाढ उल्लेखनीय असून यातून वाढत्या लोकसहभागाचे आणि संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या कामाचे महत्व अधोरेखित होते असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. “वने आणि शाश्वत शहरे” हे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय वन दिनाचे घोषवाक्य आहे. शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढते आहे, दाटीवाटीच्या घरांनी श्वास कोंडतो आहे, हे टाळायचे असेल तर “फॅमिली फॉरेस्ट” ही संकल्पना प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज वनमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :forestजंगलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार