शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

अध्यक्षपद निवडणुकीत १२ आमदार अनुपस्थित; 'मविआ'चे सर्वात जास्त सदस्य गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:11 IST

एमआयएमचे धुळे शहरचे फारुक शहा, समाजवादी पार्टीचे अबू आझमी आणि रईस शेख हे तीन आमदार मतदानावेळी तटस्थ राहिले, तर एकूण १२ आमदार या निवडणुकीला अनुपस्थित राहिले

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत तीन आमदार सभागृहात तटस्थ, तर १२ आमदार अनुपस्थित राहिले. निवडणूक एकतर्फी झाल्याने सर्व २८७ आमदारांनी मतदान केले असते तरी राहुल नार्वेकरच विजयी झाले असते, हे त्यांना मिळालेल्या १६४ मतांवरून स्पष्ट होते.

एमआयएमचे धुळे शहरचे फारुक शहा, समाजवादी पार्टीचे अबू आझमी आणि रईस शेख हे तीन आमदार मतदानावेळी तटस्थ राहिले, तर एकूण १२ आमदार या निवडणुकीला अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजप-काँग्रेसचे प्रत्येकी २ आणि एमआयएमचा १ यांचा यात समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे ते मतदानाला हजर राहू शकले नाहीत, तर नीलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, बबन शिंदे, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे, तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर हे अनुपस्थित राहिल्याने या मतांचा फटका राजन साळवी यांना बसला. मालेगाव मतदारसंघाचे एमआयएमचे आमदार इस्माईल कास्मी हेही गैरहजर होते.

आजारी असूनही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीला उपस्थित राहिलेले भाजप आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी मात्र गैरहजर होते. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची दोन मते कमी झाली. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना नियमानुसार मतदान प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याने त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही.

नीलेश लंके यांनी दिले आजारपणाचे कारणराष्ट्रवादी काँग्रेस पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी दिले आजारपणाचे कारण दिले. मालेगाव मध्य मतदार संघातील एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद गैरहजर राहिले.  आमदार बबनराव शिंदे हे परदेशातून मुंबईत परतत असल्याने ते मतदानासाठी सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत, तर आमदार प्रणिती शिंदे या घरगुती कार्यक्रमात सहभागी असल्याने सहभागी होऊ शकल्या नाहीत, अशी कारणे सांगण्यात आली. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाRahul Narvekarराहुल नार्वेकर