शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांना अवकाळी नुकसानीचे मिळणार ११ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 12:02 IST

राज्यातील १७ हजार १७१ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.  

ठळक मुद्देराज्य सरकारचा निर्णय : २५ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासाएप्रिल महिन्यात राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने उडविली दाणादाण मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात सर्वाधिक हानीपुणे विभागाला सर्वाधिक १ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधितपुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पुणे विभागातील ८५९ हेक्टर क्षेत्र बाधित

पुणे : राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ११ कोटी ७ लाख ९९ हजार १९५ रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील १७ हजार १७१ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.  राज्यात एप्रिल आणि मे २०१८मध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फळभाज्या आणि फळ पिकांचे नुकसान झाले होते. एप्रिल महिन्यात राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. या महिन्यात राज्यातील ५ हजार ९३ हेक्टर ६५ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्याचा १२ हजार ७२६ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यातही मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात सर्वाधिक हानी झाली. औरंगाबाद विभागातील २ हजार १२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्या खालोखाल पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पुणे विभागातील ८५९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.    मे महिन्यात राज्यातील १३ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला होता. पुणे, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद विभागात अवकाळीने नुकासन झाले होते. राज्यातील १ हजार ७४० हेक्टर ७४ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्यात पुणे विभागाला सर्वाधिक १ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होते. अवकाळीच्या या फेऱ्यामुळे ४ हजार ४०९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. या महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना २ कोटी ९३ लाख ६५५ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एप्रिल आणि मे या महिन्यात मिळून राज्यातील ६ हजार ८३८ हेक्टर आणि ३९ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्याचा फटका १७ हजार १७८ शेतकऱ्यांना बसला होता. त्या पोटी ११ कोटी ७ लाख ९९ हजार १९५ रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महसूल आणि कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के अथवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. मदत निधी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. ------------एप्रिल मधे अवकाळीमुळे झालेले नुकसानजिल्हा                बाधित शेतकरी        बाधित क्षेत्र        मदत निधी लाखातरायगड                  २००५                       ४१५.८४            १०४.०४पुणे                       ३६८                          ७९.६९            १२.५२सांगली                   २९१                     १३४.८०            २२.९८सोलापूर                 ६८८                       ५५७.८२            ९०.१६कोल्हापूर                ५५८                       ८७.२९            १५.५७अहमदनगर          ८२१                         ३२९.१२            ४७.९०बीड                      ९७२                          ४६९.७६            ७८.३६उस्मानाबाद          १२८८                        ५६३.०५            ८४.८८लातूर                     ८२४                         ४४५.२८            ७०.८१नांदेड                     २०८४                      ६२५.९१            ८९.३६अमरावती              २७१                       २३७.७०            ३४.१३यवतमाळ               २१४                           १५०            १८.९५वाशिम                 २६७                            १४३.३५            २१.३९गडचिरोली           २०९                               ७८.७९            १०.४८-------------------------

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीGovernmentसरकारRainपाऊसdroughtदुष्काळ