शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

राज्यात अतिवृष्टीचे १०४ बळी; २७५ गावांतील जनजीवन विस्कळीत, ७३ ठिकाणी निवारा केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 05:57 IST

राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई : यंदाच्या मोसमात आतापर्यंत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १०४ जणांचा बळी गेला. आतापर्यंत २७५ गावांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत सरासरी ४९९ मिमी पावसाची नोंद झाली असून चोवीस तासांत सरासरी ८.३ मिमी पाऊस झाला.

राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, नागपूर, पालघर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग अशा एकूण २३ जिल्ह्यांना फटका बसला. राज्यभरातील ४४ घरांचे नुकसान झाले असून १३६८ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. राज्यभरात ७३ ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आली असून पूरपरिस्थितीतून  ११ हजार ८३६ जणांना वाचविण्यात यश आले आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. गेल्या चोवीस तासांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून दोन गावांना त्यांचा फटका बसला आहे. तर ३ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे नागपूर विभागात सर्वाधिक मृत्यू झाले. यात नागपूर १५, वर्धा  ४, भंडारा २, गोंदिया ६ आणि गडचिरोली येथील ५ अशा ३२ जणांचा समावेश आहे. नाशिक विभागात नाशिकमधील १३, नंदुरबार येथे ३, धुळे येथे २ जळगाव येथे ४ आणि नगर येथील ३ जणांचा मृत्यू झाला.

धोक्याची पातळी ओलांडली 

- गडचिरोली येथे २४ तासांत २०.०० मिमी पाऊस पडला असून येथील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत.

- गोदावरी आणि इंद्रावती या नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. 

- त्यामुळे येथील १० हजार ६०६ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्र उघडण्यात आले आहेत.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र