शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

राज्यात अतिवृष्टीचे १०४ बळी; २७५ गावांतील जनजीवन विस्कळीत, ७३ ठिकाणी निवारा केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 05:57 IST

राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई : यंदाच्या मोसमात आतापर्यंत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १०४ जणांचा बळी गेला. आतापर्यंत २७५ गावांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत सरासरी ४९९ मिमी पावसाची नोंद झाली असून चोवीस तासांत सरासरी ८.३ मिमी पाऊस झाला.

राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, नागपूर, पालघर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग अशा एकूण २३ जिल्ह्यांना फटका बसला. राज्यभरातील ४४ घरांचे नुकसान झाले असून १३६८ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. राज्यभरात ७३ ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आली असून पूरपरिस्थितीतून  ११ हजार ८३६ जणांना वाचविण्यात यश आले आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. गेल्या चोवीस तासांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून दोन गावांना त्यांचा फटका बसला आहे. तर ३ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे नागपूर विभागात सर्वाधिक मृत्यू झाले. यात नागपूर १५, वर्धा  ४, भंडारा २, गोंदिया ६ आणि गडचिरोली येथील ५ अशा ३२ जणांचा समावेश आहे. नाशिक विभागात नाशिकमधील १३, नंदुरबार येथे ३, धुळे येथे २ जळगाव येथे ४ आणि नगर येथील ३ जणांचा मृत्यू झाला.

धोक्याची पातळी ओलांडली 

- गडचिरोली येथे २४ तासांत २०.०० मिमी पाऊस पडला असून येथील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत.

- गोदावरी आणि इंद्रावती या नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. 

- त्यामुळे येथील १० हजार ६०६ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्र उघडण्यात आले आहेत.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र