शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

राज्यात शंभर लाख टन साखर शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 23:00 IST

राज्यात १९५ कारखान्यांपैकी १७९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तर, ९४७.८७ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे

ठळक मुद्देमागणी घटली : यंदाही ५० लाख टन साखर राहणार पडून

पुणे : उत्तर भारतातील घटलेली मागणी, सलग दुसऱ्या वर्षी देशात साखरेचे भरगोस उत्पादन झाल्यामुळे बाजारात मालाला फारसा उठाव नसल्याने राज्यात सुमारे ९५ ते १०० लाख टन साखर पडून आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील राज्यात ५० लाख टन साखर शिल्लक राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात १९५ कारखान्यांपैकी १७९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तर, ९४७.८७ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामातही राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. विक्रमी साखर उत्पादनामुळे राज्यात हंगाम सुरु होण्यापुर्वी ऑक्टोबर २०१८मध्ये तब्बल ५३.३६ लाख टन साखर शिल्लक होती. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहिती नुसार राज्यात १५ फेब्रुवारी अखेरीस शिल्लक साखरेचे प्रमाण ११०.४३ लाख टनांवर होते. शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये केला. देशात एकसमान दर असल्याने उत्तरेकडील राज्यांंनी उत्तर प्रदेशातील साखर घेणे पसंत केले. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकमधून साखरेची मागणी कमी झाली. परिणामी राज्यातील काही कारखान्यांनी छुप्या पद्धतीने २९८० ते ३०२५ दरम्यान विक्रीस सुरुवात केली. मार्च महिन्यात देशासाठी २४ लाख टनांचा कोटा होता. मागणी घटल्याने केंद्र सरकारने एप्रिलसाठी १८ लाख टनांचा कोटा जाहीर केला. कोटा कमी झाल्याने उत्तर प्रदेशाची साखर लवकर संपली. परिणामी उत्तर प्रदेशात साखरेच्या भावात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ होऊन ३२०० रुपये झाले. मे महिन्यात साखरेचा कोटा २० लाख टनांच्या आत जाहीर झाल्यास राज्यातील साखरेला मागणी वाढेल असे साखर क्षेत्रातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ------------------म्हणून साखरेला उठाव नाही

उन्हाळ्यामध्ये आईसक्रीम, शीतपेयांना मागणी असल्याने साखरेच्या मागणीत वाढ होत असते. मोठ्या कंपन्या दोन महिने आधीच भविष्यात लागणाऱ्या मालाची खरेदी करीत असतात. अशी खरेदी करताना भावातील चढ उताराचाही अंदाज कंपन्यांकडून घेतला जातो. देशात मुबलक साखर असल्याचे स्पष्ट झाल्याने व्यापारी आणि मोठ्या कंपन्याही आवश्यकते प्रमाणेच साखर खरेदी करीत आहेत. साखरेचा साठा करुन त्यात पैसे गुंतवून ठेवले जात नाही. साखरेचा साठा बेताचा असल्यास भाववाढीची शक्यता गृहीत धरुन, जास्त खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल राहतो. त्यामुळे मागणीतही वाढ होत असते. 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार