शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्यात शंभर लाख टन साखर शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 23:00 IST

राज्यात १९५ कारखान्यांपैकी १७९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तर, ९४७.८७ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे

ठळक मुद्देमागणी घटली : यंदाही ५० लाख टन साखर राहणार पडून

पुणे : उत्तर भारतातील घटलेली मागणी, सलग दुसऱ्या वर्षी देशात साखरेचे भरगोस उत्पादन झाल्यामुळे बाजारात मालाला फारसा उठाव नसल्याने राज्यात सुमारे ९५ ते १०० लाख टन साखर पडून आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील राज्यात ५० लाख टन साखर शिल्लक राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात १९५ कारखान्यांपैकी १७९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तर, ९४७.८७ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामातही राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. विक्रमी साखर उत्पादनामुळे राज्यात हंगाम सुरु होण्यापुर्वी ऑक्टोबर २०१८मध्ये तब्बल ५३.३६ लाख टन साखर शिल्लक होती. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहिती नुसार राज्यात १५ फेब्रुवारी अखेरीस शिल्लक साखरेचे प्रमाण ११०.४३ लाख टनांवर होते. शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये केला. देशात एकसमान दर असल्याने उत्तरेकडील राज्यांंनी उत्तर प्रदेशातील साखर घेणे पसंत केले. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकमधून साखरेची मागणी कमी झाली. परिणामी राज्यातील काही कारखान्यांनी छुप्या पद्धतीने २९८० ते ३०२५ दरम्यान विक्रीस सुरुवात केली. मार्च महिन्यात देशासाठी २४ लाख टनांचा कोटा होता. मागणी घटल्याने केंद्र सरकारने एप्रिलसाठी १८ लाख टनांचा कोटा जाहीर केला. कोटा कमी झाल्याने उत्तर प्रदेशाची साखर लवकर संपली. परिणामी उत्तर प्रदेशात साखरेच्या भावात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ होऊन ३२०० रुपये झाले. मे महिन्यात साखरेचा कोटा २० लाख टनांच्या आत जाहीर झाल्यास राज्यातील साखरेला मागणी वाढेल असे साखर क्षेत्रातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ------------------म्हणून साखरेला उठाव नाही

उन्हाळ्यामध्ये आईसक्रीम, शीतपेयांना मागणी असल्याने साखरेच्या मागणीत वाढ होत असते. मोठ्या कंपन्या दोन महिने आधीच भविष्यात लागणाऱ्या मालाची खरेदी करीत असतात. अशी खरेदी करताना भावातील चढ उताराचाही अंदाज कंपन्यांकडून घेतला जातो. देशात मुबलक साखर असल्याचे स्पष्ट झाल्याने व्यापारी आणि मोठ्या कंपन्याही आवश्यकते प्रमाणेच साखर खरेदी करीत आहेत. साखरेचा साठा करुन त्यात पैसे गुंतवून ठेवले जात नाही. साखरेचा साठा बेताचा असल्यास भाववाढीची शक्यता गृहीत धरुन, जास्त खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल राहतो. त्यामुळे मागणीतही वाढ होत असते. 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार