शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

शंभर टक्के एफआरपी देणाऱ्यांना गाळप परवान्यात प्राधान्य : साखर आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 13:31 IST

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. ..

ठळक मुद्देपरवाना वितरणाबाबत निकष ठरविणारलांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरु सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानराज्यात पूरस्थितीपूर्वी ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल ऊस नुकसानीचा अंदाज येण्यास सात दिवस लागतील

पुणे : आगामी गाळप हंगामासाठी उसाची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) शंभर टक्के रक्कम दिलेल्या साखर कारखान्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी हंगामासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून, परवाना देताना या बाबी पाहिल्या जातील, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. आगामी गाळप हंगाम येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होईल. त्यापूर्वी परवाने देण्याची प्रक्रिया साखर आयुक्तालयाने सुरु केली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. तसेच, लांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरु होत्या. त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ऊस गेला. त्यानंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीचा नेमका आकडा हाती येण्यास अजूनही पाच ते सात दिवस लागतील, असे साखर आयुक्त म्हणाले. राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीपूर्वी ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला होता. पुरामुळे गाळपासाठी आणखी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे साखरेसह मळी, इथेनॉल, ब गॅस आणि कोजनचे उत्पादनही निम्म्याने घटेल असा अंदाज आहे. दरवर्षी साधारण ४४ ते ४५ लाख टन मळीचे उत्पादन होते. यंदा त्यात २० लाख टनापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे.  याबाबत माहिती देताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, आगामी गाळप हंगामासाठी दीड-दोन महिन्याचा कालावधी असला तरी परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. परवाना देताना ज्यांनी व्याजासह शंभरटक्के एफआरपी दिली त्यांचा प्राधान्याने विचार होईल. त्यानंतर शभंरटक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांना परवाना दिला जाईल. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांच्या परवाना वितरणाचे निकष ठरविण्यात येतील. --------------------ऊस नुकसानीचा अंदाज येण्यास सात दिवस लागतीलसांगली आणि कोल्हापूरला उसाचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज येण्यास अजूनही पाच ते सात दिवस लागतील. पुढील आठवड्यात साखर कारखान्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.  

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरीfloodपूर