शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 00:00 IST

या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.

अंबरनाथ : मोरीवली येथून काल रात्री शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या एका बसला पहाटेच्या सुमारास, नाशिक जिल्यातील घोटी सिन्नर महामार्गावर असलेल्या पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.

अंबरनाथ जवळील मोरीवली येथील काही रहिवासी गुरुवारी रात्रीच्या सुमारास, एकूण 15 बसेसनी शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातीलच एका बसला घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ अपघात झाला. या अपघातात मोरीवलीतील बारस्कर आणि उबाळे कुटुंबांवर काळाने घाला घातला. या अपघातात या दोन्ही कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पत्नीचा हट्ट अन् काळाचा घाला - नरेश उबाळे यांच्या पत्नी वैशाली यांना शिर्डी येथे देवदर्शनाला जाण्यासाठी पासेस मिळाले होते. यानंतर त्यांनी पती नरेश यांच्याकडे साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी हट्ट धरला होता. यावर नरेश यांनी पत्नीच्या हट्टामुळे सुट्टी घेतली आणि ते पत्नी वैशाली, मुलगी निधी व मधुरा यांच्यासह शिर्डीला निघाले. मात्र, या प्रवासादरम्यान बसला झालेल्या भीषण अपघातात नरेश उबाळे आणि त्यांची पत्नी वैशाली उबाळे यांचा मृत्यू झाला. तर 9 वर्षीय निधी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरेश हे एका वाईन शॉपमध्ये नोकरी करत होते. त्यांना 3 मोठे भाऊ असून त्यांच्या घरातील एकूण 17 जण देवदर्शनासाठी गेले होते. 

बारस्कर कुटूंबातील दोन जणांचा मृत्यूयाशिवाय, सुहास बारस्कर त्यांची पत्नी आणि दोन मुलीही याच याच बसमध्ये होत्या. या अपघातात बारस्कर यांच्या पत्नी श्रद्धा आणि मुलगी श्रावणी यांचा मृत्यू झाला आहे. तर सुहास आणि मोठी कन्या शिवन्या हे सुदैवाने बचावले आहेत. 

याच बरोबर, मोरीवली गावातील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीचे मालक गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी आणि परिचयातील व्यक्तींना शिर्डी येथे देवदर्शनासाठी मोफत घेऊन जातात, असे स्थानिकांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाambernathअंबरनाथ