शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

PM मोदींचा मध्य प्रदेश दौरा अचानक रद्द; मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 18:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती

भोपाळ - विदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यात मोदी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियानांतर्गत देशभरातील निवडक ३ हजार बुथ कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनींनी खास मध्य प्रदेशचीच निवड का केली. मात्र, कार्यक्रमाची तयारी झाली असताना मोदींचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचा दौरा रद्द झाल्याचे सांगितले. तसेच, पुढील तारीख कळवण्यात येईल, असेही ते म्हणाले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोतीलाल नेहरु स्टेडियमवरुन जाऊन पाहणीही केली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमातून दिली. उद्या २७ जून रोजी मोठ्या पावसाची शक्यता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लालपूर आणि पकरिया येथील तात्पुरत्या स्वरुपात कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या नियोजित दौऱ्याची पुढील तारीख लवकरच कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना कळवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले.  

म्हणून मध्य प्रदेशची निवड

मध्य प्रदेशमधील भाजपाच्या बूथ मॅनेजमेंटने आपल्या कार्याची अनेकदा चुणूक दाखवली आहे. हल्लीच व्ही.डी. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बूथ विस्तार अभियानामध्ये ऐतिहासिक यश मिळवलं होतं. त्याचं कौतुक केंद्रीय नेतृत्वानेही केलं होतं. तर, मध्य प्रदेश भाजपाने गेल्या काही दिवसांपूर्वी बूथ विस्तारक अभियानांतर्गत ६४ हजार बूथवरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आणि नवी उर्जा निर्माण करण्याचं काम केलं. तसेच त्यांना पूर्णपणे डिजिटलाइज्ड करण्याचंही काम केलं. त्यामधून बूथवरील एक पदाधिकारी आणि अर्थ पन्ना प्रमुखाला एका अॅपच्या माध्यमातून जोडण्यात आले. त्यांची माहिती साठवण्यात आली. त्यामुळे दिल्लीतील कार्यालयातील कुठलीही व्यक्ती त्या माहितीच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करू शकते. म्हणून मोदींनी या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशचीच निवड केली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम राज्यातील अधिकाधिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला पाहता यावा यासाठी मध्य प्रदेश भाजपाकडून व्यवस्था करण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता मन की बात कार्यक्रम ऐकते. या कारणांमुळेच मोदींनी बूथ अभियानासाठी मध्य प्रदेशची निवड केली आहे. 

टॅग्स :bhopal-pcभोपाळMadhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा