शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"देशात पैसा नाही, अदानींचे हजारो कोटी माफ केले", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 15:44 IST

मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत राजकीय सभा आणि नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

सध्याचे राज्यातील सरकार लवकरच राजीनामा देणार आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच, रोजगाराच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांत केवळ २१ नोकऱ्या दिल्या आहेत.आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी उद्योगपतींवरून सुद्धा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशातील जेवढी मोठी संपत्ती होती, ती आपल्या उद्योगपती मित्रांच्या ताब्यात देण्यात आली आहे. देशात पैसा नाही, पण अदानींसारख्या उद्योगपतींचे हजारो कोटी तुम्ही माफ केले, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधाला. 

उत्तर प्रदेशातही रोजगाराच्या नावाखाली केवळ घोटाळेच होत आहेत. राज्यात अजूनही अनेक पदे रिक्त आहेत, मात्र भरती बंद ठेवण्यात आली आहे. रोजगाराची साधने जवळपास बंद झाली आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. याचबरोबर, जाहीर सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी यांनीही जातीय जनगणनेचा उल्लेख केला. जातीय जनगणनेचे समर्थन करताना त्या म्हणाल्या की, जातीय जनगणना व्हावी अशी आमची इच्छा आहे. 

नुकतीच बिहारमध्ये जातीय जनगणना करण्यात आली, त्यात असे आढळून आले की, तेथील 84 टक्के लोक एससी, एसटी आणि ओबीसी आहेत. परंतु, ही आकडेवारी लक्षात घेऊन रोजगारावर नजर टाकली, तर मोठ्या नोकऱ्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व होत नसल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक मध्य प्रदेशातील जनतेचे भविष्य घडवणारी निवडणूक आहे, असेही रॅलीत संबोधित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसBJPभाजपा