शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

"देशात पैसा नाही, अदानींचे हजारो कोटी माफ केले", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 15:44 IST

मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत राजकीय सभा आणि नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

सध्याचे राज्यातील सरकार लवकरच राजीनामा देणार आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच, रोजगाराच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांत केवळ २१ नोकऱ्या दिल्या आहेत.आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी उद्योगपतींवरून सुद्धा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशातील जेवढी मोठी संपत्ती होती, ती आपल्या उद्योगपती मित्रांच्या ताब्यात देण्यात आली आहे. देशात पैसा नाही, पण अदानींसारख्या उद्योगपतींचे हजारो कोटी तुम्ही माफ केले, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधाला. 

उत्तर प्रदेशातही रोजगाराच्या नावाखाली केवळ घोटाळेच होत आहेत. राज्यात अजूनही अनेक पदे रिक्त आहेत, मात्र भरती बंद ठेवण्यात आली आहे. रोजगाराची साधने जवळपास बंद झाली आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. याचबरोबर, जाहीर सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी यांनीही जातीय जनगणनेचा उल्लेख केला. जातीय जनगणनेचे समर्थन करताना त्या म्हणाल्या की, जातीय जनगणना व्हावी अशी आमची इच्छा आहे. 

नुकतीच बिहारमध्ये जातीय जनगणना करण्यात आली, त्यात असे आढळून आले की, तेथील 84 टक्के लोक एससी, एसटी आणि ओबीसी आहेत. परंतु, ही आकडेवारी लक्षात घेऊन रोजगारावर नजर टाकली, तर मोठ्या नोकऱ्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व होत नसल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक मध्य प्रदेशातील जनतेचे भविष्य घडवणारी निवडणूक आहे, असेही रॅलीत संबोधित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसBJPभाजपा