शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"देशात पैसा नाही, अदानींचे हजारो कोटी माफ केले", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 15:44 IST

मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत राजकीय सभा आणि नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

सध्याचे राज्यातील सरकार लवकरच राजीनामा देणार आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच, रोजगाराच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांत केवळ २१ नोकऱ्या दिल्या आहेत.आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी उद्योगपतींवरून सुद्धा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशातील जेवढी मोठी संपत्ती होती, ती आपल्या उद्योगपती मित्रांच्या ताब्यात देण्यात आली आहे. देशात पैसा नाही, पण अदानींसारख्या उद्योगपतींचे हजारो कोटी तुम्ही माफ केले, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधाला. 

उत्तर प्रदेशातही रोजगाराच्या नावाखाली केवळ घोटाळेच होत आहेत. राज्यात अजूनही अनेक पदे रिक्त आहेत, मात्र भरती बंद ठेवण्यात आली आहे. रोजगाराची साधने जवळपास बंद झाली आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. याचबरोबर, जाहीर सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी यांनीही जातीय जनगणनेचा उल्लेख केला. जातीय जनगणनेचे समर्थन करताना त्या म्हणाल्या की, जातीय जनगणना व्हावी अशी आमची इच्छा आहे. 

नुकतीच बिहारमध्ये जातीय जनगणना करण्यात आली, त्यात असे आढळून आले की, तेथील 84 टक्के लोक एससी, एसटी आणि ओबीसी आहेत. परंतु, ही आकडेवारी लक्षात घेऊन रोजगारावर नजर टाकली, तर मोठ्या नोकऱ्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व होत नसल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक मध्य प्रदेशातील जनतेचे भविष्य घडवणारी निवडणूक आहे, असेही रॅलीत संबोधित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसBJPभाजपा