शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:46 IST

महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधानांसह तब्बल 72 मंत्र्यांनी रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यातील एक नाव म्हणजे, मध्य प्रदेशातील सावित्री ठाकुर. त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून लोकसभेवर  पोहोचल्या आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. माळवा भागातील आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक वर्षे कठीन परिश्रम घेले आहेत.

सावित्री ठाकुर या 'दीदी' नावाने ओळखल्या जातात. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मूवेल यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. 1996 मध्ये त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. त्या एका स्वयंसेवी संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी धारमधील आदिवासी आणि गरीब महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करायला सुरुवात केली. महिलांना छोट्या स्वरुपाचे कर्ज मिळवून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, याशिवाय, दारूबंदीसाठीही त्यांनी अथक परिश्रम घेतले. दहावी उत्तीर्ण असलेल्या सावित्री ठाकूर यांनी साधारणपणे एका दशकापर्यंत समाजसेविका म्हणून काम केल्यानंतर 2003 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

राजकारणात प्रवेश  करणाऱ्या ठाकुर या आपल्या कुटुंबातील पिहिल्याच सदस्य आहेत. त्यांचे वडील वनविभागातून निवृत्त  झाले आहेत. तर पती एक शेतकरी आहेत. त्या 2003 मध्ये भाजपमध्ये आल्या आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्या. यानंतर एकाच वर्षांत पक्षाने त्यांना जिल्हापरिषद अध्यक्ष बनवले. 2014 मध्ये ठाकुर यांना धारमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी १ लाख मतांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते. मात्र, यावेळी पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वासदाखवला आणि त्यांनीही पक्षाला निराश केले नाही.

सावित्री ठाकुर यांनी पक्षातही अनेक जबाबदाऱ्यांवर काम केले आहे. त्या 2010 मध्ये जिल्हा उपाध्यक्ष झाल्या होत्या. यानंतर 2013 मध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार धामनोदच्या संचालक झाल्या. 2017 मध्ये, सावित्री यांना किसान मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. आता त्या आदिवासी महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

त्या अत्यंत नम्र असून शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर असतात. त्या खते आणि बियाणांचे प्रश्न सातत्याने मांडत असतात. त्यांनी गावांतील दारूच्या दुकानांनाही कडाडून विरोध केला. महत्वाचे म्हणजे, धारमधील आठ विधानसभा जागांपैकी पाच जागा काँग्रेसकडे आहेत. यामुळे ठाकूर यांना मोदी मंत्रिमंडळात घेतल्याने या जागांवर भाजपला फायदा होऊ शकतो.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश