शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:46 IST

महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधानांसह तब्बल 72 मंत्र्यांनी रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यातील एक नाव म्हणजे, मध्य प्रदेशातील सावित्री ठाकुर. त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून लोकसभेवर  पोहोचल्या आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. माळवा भागातील आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक वर्षे कठीन परिश्रम घेले आहेत.

सावित्री ठाकुर या 'दीदी' नावाने ओळखल्या जातात. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मूवेल यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. 1996 मध्ये त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. त्या एका स्वयंसेवी संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी धारमधील आदिवासी आणि गरीब महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करायला सुरुवात केली. महिलांना छोट्या स्वरुपाचे कर्ज मिळवून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, याशिवाय, दारूबंदीसाठीही त्यांनी अथक परिश्रम घेतले. दहावी उत्तीर्ण असलेल्या सावित्री ठाकूर यांनी साधारणपणे एका दशकापर्यंत समाजसेविका म्हणून काम केल्यानंतर 2003 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

राजकारणात प्रवेश  करणाऱ्या ठाकुर या आपल्या कुटुंबातील पिहिल्याच सदस्य आहेत. त्यांचे वडील वनविभागातून निवृत्त  झाले आहेत. तर पती एक शेतकरी आहेत. त्या 2003 मध्ये भाजपमध्ये आल्या आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्या. यानंतर एकाच वर्षांत पक्षाने त्यांना जिल्हापरिषद अध्यक्ष बनवले. 2014 मध्ये ठाकुर यांना धारमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी १ लाख मतांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते. मात्र, यावेळी पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वासदाखवला आणि त्यांनीही पक्षाला निराश केले नाही.

सावित्री ठाकुर यांनी पक्षातही अनेक जबाबदाऱ्यांवर काम केले आहे. त्या 2010 मध्ये जिल्हा उपाध्यक्ष झाल्या होत्या. यानंतर 2013 मध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार धामनोदच्या संचालक झाल्या. 2017 मध्ये, सावित्री यांना किसान मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. आता त्या आदिवासी महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

त्या अत्यंत नम्र असून शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर असतात. त्या खते आणि बियाणांचे प्रश्न सातत्याने मांडत असतात. त्यांनी गावांतील दारूच्या दुकानांनाही कडाडून विरोध केला. महत्वाचे म्हणजे, धारमधील आठ विधानसभा जागांपैकी पाच जागा काँग्रेसकडे आहेत. यामुळे ठाकूर यांना मोदी मंत्रिमंडळात घेतल्याने या जागांवर भाजपला फायदा होऊ शकतो.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश