शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:46 IST

महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधानांसह तब्बल 72 मंत्र्यांनी रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यातील एक नाव म्हणजे, मध्य प्रदेशातील सावित्री ठाकुर. त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून लोकसभेवर  पोहोचल्या आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. माळवा भागातील आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक वर्षे कठीन परिश्रम घेले आहेत.

सावित्री ठाकुर या 'दीदी' नावाने ओळखल्या जातात. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मूवेल यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. 1996 मध्ये त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. त्या एका स्वयंसेवी संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी धारमधील आदिवासी आणि गरीब महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करायला सुरुवात केली. महिलांना छोट्या स्वरुपाचे कर्ज मिळवून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, याशिवाय, दारूबंदीसाठीही त्यांनी अथक परिश्रम घेतले. दहावी उत्तीर्ण असलेल्या सावित्री ठाकूर यांनी साधारणपणे एका दशकापर्यंत समाजसेविका म्हणून काम केल्यानंतर 2003 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

राजकारणात प्रवेश  करणाऱ्या ठाकुर या आपल्या कुटुंबातील पिहिल्याच सदस्य आहेत. त्यांचे वडील वनविभागातून निवृत्त  झाले आहेत. तर पती एक शेतकरी आहेत. त्या 2003 मध्ये भाजपमध्ये आल्या आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्या. यानंतर एकाच वर्षांत पक्षाने त्यांना जिल्हापरिषद अध्यक्ष बनवले. 2014 मध्ये ठाकुर यांना धारमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी १ लाख मतांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते. मात्र, यावेळी पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वासदाखवला आणि त्यांनीही पक्षाला निराश केले नाही.

सावित्री ठाकुर यांनी पक्षातही अनेक जबाबदाऱ्यांवर काम केले आहे. त्या 2010 मध्ये जिल्हा उपाध्यक्ष झाल्या होत्या. यानंतर 2013 मध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार धामनोदच्या संचालक झाल्या. 2017 मध्ये, सावित्री यांना किसान मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. आता त्या आदिवासी महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

त्या अत्यंत नम्र असून शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर असतात. त्या खते आणि बियाणांचे प्रश्न सातत्याने मांडत असतात. त्यांनी गावांतील दारूच्या दुकानांनाही कडाडून विरोध केला. महत्वाचे म्हणजे, धारमधील आठ विधानसभा जागांपैकी पाच जागा काँग्रेसकडे आहेत. यामुळे ठाकूर यांना मोदी मंत्रिमंडळात घेतल्याने या जागांवर भाजपला फायदा होऊ शकतो.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश