शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 21:00 IST

"काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? देश टिकेल का?"

हे लोक (I.N.D.I.A.) पंतप्रधान पदाच्या खुर्चीचाही लिलाव करण्याच्या तयारीत आहेत आणि 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करत आहेत. अर्थात दर वर्षी एक नवा पंतप्रधान. एक वर बसेल आणि चार लोक खुर्चीचे पाय पकडून खाली बसतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या I.N.D.I.A. वर जोरदार प्रहार केला आहे. ते मध्यप्रदेशातील बैतूल येथील प्रचारसभेत बोलत होते. 

सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, 'आपला आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. जनता-जनार्दन हे परमेश्वराचे रूप आहे आणि जनता-जनार्दन जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा तो साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद असतो. आजकाल आशीर्वाद देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कमळाचे बटण दाबून मोदींना आशीर्वाद द्या. आपल्या एका मताने भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. आपल्या एका मताने परदेशात भारताचा डंका वाजला. आपल्या एका मताने सीमेवर डोळे वटारून बघणाऱ्या शत्रूला धडा शिकवला. आपल्या एका मताने 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येतील भव्य मंदिरात रामललांची प्रतिष्ठापना झाली.'

'ते' पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त - विरोधकांच्या I.N.D.I.A. वर हल्ला चढवताना मोदी म्हणाले, "आपल्याला एक गोष्ट ऐकूण हसायला येईल आणि भीतीही वाटेल. काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? देश टिकेल का? आपली स्वप्न टिकतील का? आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहील का? ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त आहेत."

धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प - तत्पूर्वी, सागर येथील एका प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले, "आज काँग्रेसचे एक असे सत्य देशासमोर आले आहे, जे ऐकून देशातील प्रत्येक नागरिक अवाक झाला आहे. धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे आपल्या संविधानात स्पष्टपणे नमूद आहे. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः धर्माच्या आधारावर आरक्षणाच्या विरोधात होते. मात्र, काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत."

OBC चा हक्क हिसकावून मुस्लिमांना दिला -पीएम मोदी म्हणाले, "गेल्या वेळी कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण दिले होते. यासाठी काँग्रेसने मागच्या दाराने आणि बेकायदेशीरपणे चलाखी केली होती. ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा गुन्हा काँग्रेसने केला होता. यासाठी त्यांनी मुस्लिमांच्या सर्व जातींना ओबीसी कोट्यात टाकले आहे. असे करून त्यांनी ओबीसींचे मोठे अधिकार हिरावून घेतले आणि धर्माच्या आधारावर दिले. हाच फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेस OBC प्रवर्गाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांनी OBC समाजाचा हक्क हिरावला आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची हत्या केली आहे. संविधानाचा अनादर केला आहे आणि बाबासाहेबांचाही घोर अपमान केला आहे."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी