शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी रेशीम शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST

रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित उद्योग असून त्यात रोजगाराची मोठी क्षमता आहे. प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या क्षेत्रामध्ये ...

रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित उद्योग असून त्यात रोजगाराची मोठी क्षमता आहे. प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या क्षेत्रामध्ये या उद्योगास पोषक वातावरण असल्याने रेशीम उत्पादन करण्यास भरपूर वाव आहे. त्यातून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी तीर्थकर यांनी केले.

पोखरा योजनेंतर्गत आणि महारेशीम अभियानांतर्गत दीनानाथ नागरगोजे यांच्या बागेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ शेतकरी देवनाथ नागरगोजे, विठ्ठल भांगे, नईम सय्यद, शाबुद्दीन सय्यद, दादाराव नागरगोजे, सतीश नाईक आदी उपस्थित होते. तसेच सोनवळा व लाळी (बु.) येथील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी तीर्थकर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत आहे. हवामानातील बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने रेशीमवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे या घटकाचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.