शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांअभावी २०० बसेसची चाके जाग्यावरच थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात ४०० बसेस नियमित धावत हाेत्या. मात्र, मार्च २०२० पासून काेराेना महामारीने एसटी ...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात ४०० बसेस नियमित धावत हाेत्या. मात्र, मार्च २०२० पासून काेराेना महामारीने एसटी महामंडळाचे अर्थचक्र पूर्णत: काेलमडले आहे. राज्यातील लाॅकडाऊनने एस. टी. आणि त्यांचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करणेही अवघड झाले आहे. केवळ २५ ते ४० टक्क्यांच्या भारमानावर सध्या एसटीचा प्रवास सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून एस.टी.ची चाके जाग्यावरच थांबली आहेत. ६ जूनपासून अनलाॅकची प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरू झाली. टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रवाशांचा अद्यापही प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाने पूर्ण क्षमतेने एस.टी. बसेस सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या लांब पल्ल्यासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर लालपरी धावत आहे.

मालवाहतुकीचा मिळाला आधार...

एस. टी. महामंडळाने आपल्या आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग शाेधले आहेत. काेराेनाच्या काळात सर्वच यंत्रणा काेलमडली असताना, एस़टी़ने मालवाहतुकीवर भर देत काही प्रमाणात उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत एस़टी़ला मालवाहतुकीचा आधार मिळाला आहे. मात्र, यातूनही महामंडळाची आर्थिक गरज भागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आर्थिक नियाेजनच काेलमडल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत.

वाडी-तांड्यावरील बसफे-या बंदच...

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातून ग्रामीण भागातील गाव, वाडी-तांड्याच्या मार्गावर माेठ्या प्रमाणावर बससेवा सुरू करण्यात आली हाेती. मात्र, ‘काेराेना’ने सर्वच बसेस सध्या जाग्यावरच थांबल्या आहेत. लातूर विभागातील ४५० बसेसपैकी २०० बसेस आजही बंद आहेत. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण भागातील दळणवळण थंडावले...

ज्या गावात रेल्वे अथवा खासगी वाहने पाेहोचली नाहीत, अशा गाव, वाडी-तांड्यावर महामंडळाची एसटी बस पाेहोचली असून, लालपरीला ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या लालपरीच बंद असल्याने इतर पर्यायी वाहनांचा वापर करावा लागत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दळणवळण थंडावले आहे.

महामंडळाला मालवाहतुकीचा थाेडाफार आधार मिळाला आहे. आता कुरिअर सेवाही देण्याचा विचार महामंडळ करत आहे. कुरिअर सेवा ग्रामीण भागातील गाव, वाडी-तांड्यापर्यंत घेऊन जाण्याचा विचार सुरू आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू आहेत. परिणामी, एसटीला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.