शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत पाणीच पाणी! मराठवाड्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस लातूर जिल्ह्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 19:47 IST

आता हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात आता हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मराठवाड्यात मागील २० दिवसांत सर्वाधिक पावसाची नोंद लातूर जिल्ह्यात झाली. येथे १९३.४ मिमी पाऊस झाला. त्या खालोखाल धाराशिव जिल्ह्यात १६७.५ मिमी पाऊस झाला.

विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ६ मेपासून वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. प्रारंभी रिमझिम पावसाच्या सरी आणि विजांचा कडकडाट सुरू होता. वीज कोसळून आतापर्यंत मराठवाड्यात २७ पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. शेतकरी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मशागतीवर अधिक भर देतात. यंदा मराठवाड्याला मे महिन्याचे कडक ऊन जाणवलेच नाही. तापमान साधारण २९ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. हवामान चक्र बिघडल्याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे.

शेतीत पाणीच पाणीमृग नक्षत्र सुरू होण्यास अजून १३ दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच मान्सून सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात येत असल्याने शेतकरी आणखी हवालदिल झाले आहेत. शेतात पाणी साचलेले असल्याने मशागत कधी करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊसजिल्हा----------------पाऊस मिमीछत्रपती संभाजीनगर ---१२२.३जालना------------------ १३७.९बीड---------------------१३९.९लातूर------------------ १९३.४धाराशिव------------------ १६७.५नांदेड--------------------१०४.९परभणी------------------ ९३.८हिंगोली------------------१०२.८

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र