शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या साहित्याच्या वाहतुकीसाठी गाढवाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST

शिरूर अनंतपाळ : शेतीस ये-जा करण्यासाठी रस्ता नसलेले शेतकरी खरीप हंगामातील पेरणीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी आता गाढवांचा वापर करीत ...

शिरूर अनंतपाळ : शेतीस ये-जा करण्यासाठी रस्ता नसलेले शेतकरी खरीप हंगामातील पेरणीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी आता गाढवांचा वापर करीत आहेत. त्यामुळे बी- बियाणे, खते बांधावर पोहोच करण्यास मदत होत आहे.

तालुक्यातील काही गावात शेत रस्त्याच्या समस्या वर्षानुवर्षे सुरू आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेताला जाण्यासाठी पावसाळ्यात रस्त्या नसतो. ज्या शेताला पाणंद रस्ता आहे, त्याठिकाणी पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या साहित्याची वाहतूक कशी करायची असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांपुढे निर्माण होतो. डोक्यावर खते, बियाणे घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे तालुक्यातील दैठणा येथील शेतकऱ्यांनी नवी शक्कल शोधून काढली आहे. पेरणीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी दुर्गम भागातील शेतकऱ्यांप्रमाणे गाढवांचा वापर सुरू केला आहे.

एका गोणीला २० रूपये भाडे...

शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पोहाेच करण्याबाबत गोरख कासराळे म्हणाले, गाढवांच्या पाठीवरून एका गोणीची वाहतूक करण्यासाठी २० रूपये भाडे घेतले जात असून एका खेपेला दीडशे ते दोनशे रुपये मिळतात. शेतीसाठी पाणंद रस्ता असल्यास खरिपाच्या पेरणी दरम्यान चिखलामुळे बैलगाडी अथवा ट्रॅक्टरसारखी वाहने घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची पेरणी करण्यासाठी खूप मोठी अडचण होते. त्यामुळे अडचणीच्या काळात ही चांगली सोय होत असल्याचे शेतकरी राजकुमार नमनगे, हरिश्चंद्र बिरादार, योगेश बिरादार यांनी सांगितले.