शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

उदगीरच्या भाजीपाला मार्केटमध्ये दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

उदगीर : येथील भाजी मार्केटमध्ये असलेल्या दुकानदारांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...

उदगीर : येथील भाजी मार्केटमध्ये असलेल्या दुकानदारांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. यात चाकू, दगड, टिकावाच्या दांड्याने एकमेकांवर हल्ला केल्याने दोन्ही गटांतील सातजण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाचजणांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी सांगितले, मिर्झा नोमान सरदार बेग (रा. कासीमपुरा) याच्या फिर्यादीवरून आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांना जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू, दगड, टिकावाच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आठजणांविरुद्ध कलम ३०७, ३२६, ३२३, १४३, १४७, १४९, ५०६, ५०४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर अल्ताफ खुर्शीद बेग (रा. किलागल्ली) यांच्या फिर्यादीवरून रस्त्यावर ठेवलेले कोंबडे कोंडण्याची जाळी काढून घेण्याच्या कारणावरून आठजणांनी सत्तूर, दगड, लाकडाने मारून पाय फॅक्चर केला अशा आशयाची फिर्याद दिली आहे. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील करीत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव शहरात दाखल झाले. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.