शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लामजनाच्या भाविकांवर मध्य प्रदेशात काळाचा घाला, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 08:55 IST

मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

औसा (जि. लातूर) - मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील लामजना येथील लाडखाँ परिवार अजमेरला देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान, गावाकडे परतताना मध्य प्रदेशातील रतलाम शहराडवळ उभा असलेल्या ट्रकवर भरधाव जीप आदळली. हा भीषण अपघात शुक्रवारी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. 

लामजना येथील लाडखाँ परिवार 19 ऑगस्ट रोजी रात्री अजमेरच्या दिशेने जीपने (एमएच 25 आर 0854) निघाले होते. दरम्यान, अजमेर येथील देवदर्शनानंतर सदर जीप गावाकडे निघाली होती. शुक्रवारी (23 ऑगस्ट) सकाळी मध्य प्रदेशातील नसिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रतलाम शहरानजीकच्या टोलनाक्यावर थांबलेल्या ट्रकवर (एचआर 65 ए-9370) भरधाव जीप आदळली. या भीषण अपघातात सलिम अब्दुल लाडखाँ (52), अलिशा शफीक लाडखाँ (30), रहिम सालार मुल्ला (35, सर्व रा. लामजना) हे ठार झाले. तर शफीक सलिम लाडखाँ (35), जन्नतबी सलिम लाडखाँ (50), अल्फिया शफीक लाडखाँ (8), अर्शद शफीक लाडखाँ (5), अहिल शफीक लाडखाँ (वय दीड वर्ष) आणि चालक नूरमहमंद शेख (30, सर्व रा. लामजना) हे गंभीर जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना रतलाम येथील शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईक सय्यद लाडखाँ यांनी दिली आहे. 

लामजना गावावर शोककळा...

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या लामजना या गावातील भाविकांनी मध्य प्रदेशातील अजमेर येथे देवदर्शनासाठी जाण्याचे ठरविले. त्यानुसार दर्शन घेऊन परतताना काळाने घाला घातला. शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघाताची माहिती लामजना गावात समजली. त्यानंतर गावावर शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूlaturलातूरMadhya Pradeshमध्य प्रदेश