शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

'५० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना निवडणूक कर लावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 8:49 PM

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची मागणी

लातूर : निवडणुकांमधील पैशाचा वापर हा चिंतेचा अन् चिंतनाचा विषय असून लोकांनी व माध्यमांनी पुढे येऊन सुधारणा सांगितल्या पाहिजेत. प्रामुख्याने उमेदवारासह निवडणुकीचा खर्च शासकीय तिजोरीतून करावा. त्यासाठी ५० कोटींवर ज्यांचे उत्पन्न आहे, त्यांना निवडणूक कर लावता येईल. ज्यामुळे प्रचाराच्या बेहिशेबी खर्चावर नियंत्रण आणता येईल, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.चाकूरकर म्हणाले, गेल्या काही निवडणुकांमध्ये पैशाचा वापर कैकपटीने वाढला आहे. खर्चासाठी आयोगाच्या मर्यादा असल्या तरी प्रत्यक्षात होणारा खर्च गैरमार्ग खुले करणारा आहे़ जगभरातील लोकशाही देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा अभ्यास केला पाहिजे. प्रचाराचे तंत्र आणि निवडणूक प्रक्रियेसाठी होणारा खर्च याबद्दल माध्यमांनी जनजागृती करावे व उपाय सुचवावेत, असे ते म्हणाले.राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. स्वातंत्र्यानंतर भारताने संरक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल केले. समुद्रावरील आपले सार्वभौमत्व सिद्ध केले. अवकाश संशोधनात प्रगती केली. हरितक्रांती झाली. खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. अन्नसुरक्षा कायदा केला. जनतेला माहितीचा अधिकार दिला. रोजगार हमी योजना दिली. हे सर्व करताना काँग्रेसने कधीही श्रेय घेतले नाही. ज्या उणिवा राहिल्या, त्या मात्र स्वत: स्वीकारल्या. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत काय झाले हा प्रश्न विचारणाऱ्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला. काँग्रेसने संस्थाने विलिन केली. एकसंघ देश उभा राहिला. जे इतिहासात कोणाला जमले नाही ते काँग्रेसने केले, असेही चाकूरकर यांनी सांगितले.नेत्यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांवर बोलले पाहिजे. परंतु, आज व्यक्तिगत टीका केली जात आहे, असे सांगताना चाकूरकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी अलिकडच्या काळात केलेल्या व्यक्तिगत टीकेकडे लक्ष वेधले. विरोधी पक्ष हा वेगळ्या विचाराचा असू शकतो. तो शत्रूपक्ष असत नाही, असेही ते म्हणाले. नाना - तनुश्री वाद; दोषी कोण, हे ठरविणारे आपण कोण?नाना - तनुश्री वादात दोषी कोण, हे ठरविणारे मी किंवा तुम्ही कोण आहोत?  असा सवाल उपस्थित करून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे, हे आपला कायदा सांगतो. दरम्यान, आरोपाची चौकशी होऊन सत्य समोर आल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नाही़ सिनेसृष्टी, राजकीय अशा कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तिकडून गुन्हा घडला असेल तर कायदेशीर प्रक्रिया आहे़ न्याय करायचा असेल वा कारवाई करायची असेल ती कायद्याने होईल़ त्याआधीच माध्यमांमध्ये चर्चा घडविणे, प्रतिक्रिया देणे म्हणजे कोणावर तरी अन्याय करण्यासारखे आहे, असेही चाकूरकर म्हणाले. 

टॅग्स :Shivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरElectionनिवडणूकMONEYपैसा