शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST

चापोली : कोविडमुळे अनेजण दगावले आहेत. यात अल्पवयीन मुलांचे आई अथवा वडील आणि काहींनी आई- वडील असे पालकांचे छत्र ...

चापोली : कोविडमुळे अनेजण दगावले आहेत. यात अल्पवयीन मुलांचे आई अथवा वडील आणि काहींनी आई- वडील असे पालकांचे छत्र गमावले आहे. या बालकांचे पालकत्व राज्याचा महिला व बालकल्याण विभाग घेणार आहे. चाकूर तालुक्यात अशा १८ बालकांची नोंद झाली असून, सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

बालकांना पालकांच्या आधाराची गरज असते. कोरोनामुळे उपचार घेताना काही बालकांची आई अथवा वडिलांचा मृत्यू झाला. तसेच आई आणि वडील अशा दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परस्थितीत मुलांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाहासाठी शासन त्यांचे पालकत्व घेऊन आवश्यक ती मदत करणार आहे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना शासन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचा शोध आरोग्य विभाग व तालुकास्तरीय यंत्रणेमार्फत घेतला जात आहे.

बाल संगोपन योजनेंतर्गत कोणत्याही कारणाने आई अथवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना आता दरमहा ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. आतापर्यंत ही मदत ४२५ रुपये अशी होती. मात्र, शासनाने त्या रकमेत वाढ केली आहे. दुर्धर आजार अथवा कैदी, विधवा महिलांच्या १८ वर्षांखालील मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.

आई अथवा वडील गमावलेल्या मुलांचा सांभाळ करण्यास इतर नातेवाईक तयार असतील तर त्यांच्या रेशनसाठी विशिष्ट रक्कम दिली जाणार आहे. तसेच पालक नसल्यास त्यांची बालगृहात व्यवस्था केली जाणार आहे. ० ते ६ वयोगटातील अनाथ बालकांना शिशुगृहात ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर अनेकदा मालमत्तेचे वाद निर्माण होतात. या वादांचे निराकरण करण्याचे कामही या विभागाकडून होणार आहे.

कोरोनामुळे काही मुलांचे मायेचे छत्र हरवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर कृती दल गठित करण्यात आले आहे. अध्यक्षपद हे जिल्हाधिकाऱ्यांकडे असून सदस्य म्हणून बालविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे कृती दल दर १५ दिवसांनी बैठक घेऊन मुलांच्या संगोपनासाठी केलेल्या कामाचा आढावा घेणार आहे.

संख्या वाढण्याची शक्यता...

कोरोनाने मृत्यू होणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार अशा मुलांचा शोध घेतला जात आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत अशा कुटुंबांचा सर्व्हे केला जात आहे. त्यामुळे संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे चाकूरच्या महिला व बाल प्रकल्पाच्या विस्तार अधिकारी अर्चना कलशेट्टी यांनी सांगितले.