शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा; खरीप उत्पादन ६० टक्के घटल्याने बळीराजा हतबल

By हरी मोकाशे | Updated: August 26, 2023 17:23 IST

चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून असली तरी वाढ खुंटली आहे.

लातूर : पावसाळा ऋतू असूनही उन्हाळ्यासारख्या तीव्र उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. जवळपास महिनाभरापासून पावसाने ताण दिला आहे. परिणामी, हलक्या व मध्यम जमिनीवरील पिके करपत आहेत. चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून असली तरी वाढ खुंटली आहे. एकंदरित, पावसाअभावी खरीपाच्या उत्पादनात साधारणत: ६० टक्क्यांची घट झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हतबल झाला आहे.

यंदा विलंबाने पाऊस झाल्याने पेरण्याही लांबल्या. आगामी काळात पाऊस पडेल म्हणून शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर खरीपाच्या पेरण्या उरकल्या. जिल्ह्यात ९८ टक्के पेरण्या झाल्या असून त्यात सोयाबीन ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टर, तूर - ६४ हजार ४६३, उडीद- २ हजार ९१९ तर मुगाचा ४ हजार ३९८ हेक्टरवर पेरा झाला आहे. जुलैमध्ये सतत रिमझिम व संततधार पाऊस झाला. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव अन् तण वाढले. जुलैअखेरीसपासून पावसाने ताण दिला आहे.

सोयाबीन सध्या फुलोऱ्यात असल्याने पावसाची नितांत गरज आहे. परंतु, वरुणराजाने गुंगारा दिल्याने हलक्या, मध्यम जमिनीवरील पिके वाळू लागली आहेत. ही पिके जगविण्यासाठी काही शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची धडपड करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३३६.२ मिमी पाऊस झाला असून १९९.६ मिमी पावसाची तूट आहे.

२७ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा अधिकचा खंड...जिल्ह्यातील २१ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला आहे. त्यात लातूर, बाभळगाव, हरंगुळ, कासारखेडा, मुरुड, गातेगाव, तांदुळजा, चिंचोली, कनेरी. बेलकुंड, किनी, उजनी, पानचिंचोली, कासार बालकुंदा, मदनसुरी, भुतमुगळी, उदगीर, ताेंडार, चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी, आष्टा, कारेपूर, हिसामाबाद, घोणसी मंडळाचा समावेश आहे.

३३ मंडळात २० दिवसांपेक्षा जास्तीचा खंड...जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडळे आहेत. त्यापैकी ३२ महसूल मंडळात १५ ते २० दिवसांपेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला आहे. परिणामी हलक्या, मध्यम जमिनीवरील पिकांच्या उत्पानात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी धास्तावला आहे.

रॅन्डम पध्दतीने सर्वेक्षण सुरु...जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात रॅन्डम पध्दतीने सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. कृषी सहाय्यक, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक शेतकरी सर्वेक्षण करीत आहेत. ३० ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. तो अहवाल शासनास पाठविण्यात येईल. त्यानंतर शासन आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.- शिवसांब लाडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

पिकांबरोबर फळबागांनाही फटका...महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. पाण्याअभावी बहरलेल्या पिकांची फुलगळ, फळगळ वाढली आहे. पिके निस्तेज झाली आहेत. फळबागांचे माेठे नुकसान झाले आहे. उत्पादनात मोठी घट होणार आहे.- भागवत बिरादार, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसlaturलातूर