शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा; खरीप उत्पादन ६० टक्के घटल्याने बळीराजा हतबल

By हरी मोकाशे | Updated: August 26, 2023 17:23 IST

चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून असली तरी वाढ खुंटली आहे.

लातूर : पावसाळा ऋतू असूनही उन्हाळ्यासारख्या तीव्र उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. जवळपास महिनाभरापासून पावसाने ताण दिला आहे. परिणामी, हलक्या व मध्यम जमिनीवरील पिके करपत आहेत. चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून असली तरी वाढ खुंटली आहे. एकंदरित, पावसाअभावी खरीपाच्या उत्पादनात साधारणत: ६० टक्क्यांची घट झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हतबल झाला आहे.

यंदा विलंबाने पाऊस झाल्याने पेरण्याही लांबल्या. आगामी काळात पाऊस पडेल म्हणून शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर खरीपाच्या पेरण्या उरकल्या. जिल्ह्यात ९८ टक्के पेरण्या झाल्या असून त्यात सोयाबीन ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टर, तूर - ६४ हजार ४६३, उडीद- २ हजार ९१९ तर मुगाचा ४ हजार ३९८ हेक्टरवर पेरा झाला आहे. जुलैमध्ये सतत रिमझिम व संततधार पाऊस झाला. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव अन् तण वाढले. जुलैअखेरीसपासून पावसाने ताण दिला आहे.

सोयाबीन सध्या फुलोऱ्यात असल्याने पावसाची नितांत गरज आहे. परंतु, वरुणराजाने गुंगारा दिल्याने हलक्या, मध्यम जमिनीवरील पिके वाळू लागली आहेत. ही पिके जगविण्यासाठी काही शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची धडपड करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३३६.२ मिमी पाऊस झाला असून १९९.६ मिमी पावसाची तूट आहे.

२७ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा अधिकचा खंड...जिल्ह्यातील २१ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला आहे. त्यात लातूर, बाभळगाव, हरंगुळ, कासारखेडा, मुरुड, गातेगाव, तांदुळजा, चिंचोली, कनेरी. बेलकुंड, किनी, उजनी, पानचिंचोली, कासार बालकुंदा, मदनसुरी, भुतमुगळी, उदगीर, ताेंडार, चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी, आष्टा, कारेपूर, हिसामाबाद, घोणसी मंडळाचा समावेश आहे.

३३ मंडळात २० दिवसांपेक्षा जास्तीचा खंड...जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडळे आहेत. त्यापैकी ३२ महसूल मंडळात १५ ते २० दिवसांपेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला आहे. परिणामी हलक्या, मध्यम जमिनीवरील पिकांच्या उत्पानात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी धास्तावला आहे.

रॅन्डम पध्दतीने सर्वेक्षण सुरु...जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात रॅन्डम पध्दतीने सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. कृषी सहाय्यक, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक शेतकरी सर्वेक्षण करीत आहेत. ३० ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. तो अहवाल शासनास पाठविण्यात येईल. त्यानंतर शासन आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.- शिवसांब लाडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

पिकांबरोबर फळबागांनाही फटका...महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. पाण्याअभावी बहरलेल्या पिकांची फुलगळ, फळगळ वाढली आहे. पिके निस्तेज झाली आहेत. फळबागांचे माेठे नुकसान झाले आहे. उत्पादनात मोठी घट होणार आहे.- भागवत बिरादार, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसlaturलातूर