शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

साखर प्रति किलो ३ रुपयांनी वधारली; मेथी, पालक, शेपूच्या दरात घसरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST

लातूर : दिवाळीनंतर खाद्यतेल पुन्हा प्रति किलो १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे. तर भाजीपाल्यांचे दर मात्र कवडीमोल ...

लातूर : दिवाळीनंतर खाद्यतेल पुन्हा प्रति किलो १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे. तर भाजीपाल्यांचे दर मात्र कवडीमोल झाले आहेत. मेथी, पालक, शेपूच्या तीन पेंढ्या १० रुपयांमध्ये मिळत असल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तूर डाळ, चनाडाळ आणि मसूर डाळीचे भाव या आठवड्यात स्थिर आहेत. मूग डाळ १२० रुपयांच्या घरात गेली आहे.

ऐन दिवाळीच्या सणात खाद्यतेल, चनाडाळीने भाव खाल्ला होता. दिवाळीनंतर अचानकपणे भाजीपाल्यांचे भाव शंभरीच्या घरात होते. दिवाळीनंतर दोन आठवडे साखरेचे दर स्थिर होते. आता प्रति किलो २ ते ३ रुपयांनी साखर महागली आहे. भाजीपाला आवाक्यात असून, भेंडी ३५, पत्तागोबी २५, फुलकोबी २५, गवार ५०, टोमॅटो २० रुपये, बटाटे ३० ते ३५ रुपये, मेथी, पालक, शेपू तीन पेंढ्या १० रुपये, चुका ४० रुपये, कांदा पेंढी ५ ते ८ रुपये, शिमला मिरची ३० रुपये, हिरवी मिरची २५ रुपये, कोथिंबीर १० रुपयांना पेंढी. वांगी १५ रुपये, दोडका ४० रुपये, भोपळा २० रुपये नग, वरणा ४० रुपये, गाजर ३० रुपये किलो, करडई भाजी ३० रुपये, हरभरा भाजी ५० रुपये, काकडी प्रति किलो ३० रुपये दराने मिळत आहे.

किराणामध्ये खाद्यतेल १२० रुपये किलोने मिळत आहे. साखर ३५ वरून ३८ वर गेली आहे. खोबरं १८०, शेंगदाणा ९० ते १००, पोहे ४० रुपये, तांदूळ ३५ ते ५०, चुरमुरे प्रति किलो ५० ते ६० रुपये दराने मिळत आहे. गत आठवड्यात किराणा मालाचे भाव वधारले असून, भाजीपाला मात्र घसरला आहे.

किराणा मालाच्या डाळीमध्ये मूगडाळ आणि तूरडाळ सर्वाधिक महाग आहे. प्रति किलोला १२० रुपयांचा दर असून, चनाडाळ ७० रुपये, मसूर डाळ १०० रुपये प्रति किलो आहे. खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा वधारल्या आहेत. ९५ रुपयांवरून १२० रुपये प्रतिकिलो भाव पोहोचला आहे. यातून महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे.

एकिकडे भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत. तर दुसरीकडे साखरेचा दर मात्र वधारला आहे. दिवाळीत ३४ ते ३५ रुपये किलो मिळणारी साखर आता ३८ रुपये दराने मिळते.

किराणामध्ये साखरेबरोबर खाद्यतेल महागले आहे. सर्वाधिक साखर, खाद्यतेल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मागणी असते. याच वस्तूंचे भाव गत आठवड्यात वधारले आहेत. काहींचे भाव मात्र स्थिर आहेत.

-गोविंद खंडागळे,

व्यापारी

सध्या थंडीचे दिवस असल्याने फळांना मोठी मागणी आहे. सफरचंद, चिकू, पेरू, सीताफळ, डाळिंब व इतर फळांची मोठी आवक होत आहे. प्रति किलो १०० रुपयांच्या घरात दर आहेत. सफरचंद ८० ते १०० रु., पेरु ३० ते ४० रुपये.

- बाबा शेख,

फळविक्रेता

दिवाळीनंतर भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले होते. आता दोन आठवडे झाले भाव घसरले आहेत. सध्या २० ते ३० रुपये दराने प्रति किलो भाजीपाला मिळू लागला आहे. मेथी, पालक, शेपूचे भाव तर मातीमोल झाले आहेत.

- भीमा शिंदे,

भाजीपाला विक्रेता