शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

साखर प्रति किलो ३ रुपयांनी वधारली; मेथी, पालक, शेपूच्या दरात घसरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST

लातूर : दिवाळीनंतर खाद्यतेल पुन्हा प्रति किलो १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे. तर भाजीपाल्यांचे दर मात्र कवडीमोल ...

लातूर : दिवाळीनंतर खाद्यतेल पुन्हा प्रति किलो १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे. तर भाजीपाल्यांचे दर मात्र कवडीमोल झाले आहेत. मेथी, पालक, शेपूच्या तीन पेंढ्या १० रुपयांमध्ये मिळत असल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तूर डाळ, चनाडाळ आणि मसूर डाळीचे भाव या आठवड्यात स्थिर आहेत. मूग डाळ १२० रुपयांच्या घरात गेली आहे.

ऐन दिवाळीच्या सणात खाद्यतेल, चनाडाळीने भाव खाल्ला होता. दिवाळीनंतर अचानकपणे भाजीपाल्यांचे भाव शंभरीच्या घरात होते. दिवाळीनंतर दोन आठवडे साखरेचे दर स्थिर होते. आता प्रति किलो २ ते ३ रुपयांनी साखर महागली आहे. भाजीपाला आवाक्यात असून, भेंडी ३५, पत्तागोबी २५, फुलकोबी २५, गवार ५०, टोमॅटो २० रुपये, बटाटे ३० ते ३५ रुपये, मेथी, पालक, शेपू तीन पेंढ्या १० रुपये, चुका ४० रुपये, कांदा पेंढी ५ ते ८ रुपये, शिमला मिरची ३० रुपये, हिरवी मिरची २५ रुपये, कोथिंबीर १० रुपयांना पेंढी. वांगी १५ रुपये, दोडका ४० रुपये, भोपळा २० रुपये नग, वरणा ४० रुपये, गाजर ३० रुपये किलो, करडई भाजी ३० रुपये, हरभरा भाजी ५० रुपये, काकडी प्रति किलो ३० रुपये दराने मिळत आहे.

किराणामध्ये खाद्यतेल १२० रुपये किलोने मिळत आहे. साखर ३५ वरून ३८ वर गेली आहे. खोबरं १८०, शेंगदाणा ९० ते १००, पोहे ४० रुपये, तांदूळ ३५ ते ५०, चुरमुरे प्रति किलो ५० ते ६० रुपये दराने मिळत आहे. गत आठवड्यात किराणा मालाचे भाव वधारले असून, भाजीपाला मात्र घसरला आहे.

किराणा मालाच्या डाळीमध्ये मूगडाळ आणि तूरडाळ सर्वाधिक महाग आहे. प्रति किलोला १२० रुपयांचा दर असून, चनाडाळ ७० रुपये, मसूर डाळ १०० रुपये प्रति किलो आहे. खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा वधारल्या आहेत. ९५ रुपयांवरून १२० रुपये प्रतिकिलो भाव पोहोचला आहे. यातून महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे.

एकिकडे भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत. तर दुसरीकडे साखरेचा दर मात्र वधारला आहे. दिवाळीत ३४ ते ३५ रुपये किलो मिळणारी साखर आता ३८ रुपये दराने मिळते.

किराणामध्ये साखरेबरोबर खाद्यतेल महागले आहे. सर्वाधिक साखर, खाद्यतेल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मागणी असते. याच वस्तूंचे भाव गत आठवड्यात वधारले आहेत. काहींचे भाव मात्र स्थिर आहेत.

-गोविंद खंडागळे,

व्यापारी

सध्या थंडीचे दिवस असल्याने फळांना मोठी मागणी आहे. सफरचंद, चिकू, पेरू, सीताफळ, डाळिंब व इतर फळांची मोठी आवक होत आहे. प्रति किलो १०० रुपयांच्या घरात दर आहेत. सफरचंद ८० ते १०० रु., पेरु ३० ते ४० रुपये.

- बाबा शेख,

फळविक्रेता

दिवाळीनंतर भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले होते. आता दोन आठवडे झाले भाव घसरले आहेत. सध्या २० ते ३० रुपये दराने प्रति किलो भाजीपाला मिळू लागला आहे. मेथी, पालक, शेपूचे भाव तर मातीमोल झाले आहेत.

- भीमा शिंदे,

भाजीपाला विक्रेता