शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग; दाेघांना सहा महिन्यांचा कारावास, लातूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालचा निकाल
By राजकुमार जोंधळे | Updated: May 31, 2025 21:12 IST2025-05-31T21:11:47+5:302025-05-31T21:12:04+5:30
दरम्यान, लातूर ग्रामीणचे डीवायएसपी सुनील गोसावी, मुरुडचे सपोनि. अशोक उजगरे यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून आरोपीविराेधात सबळ पुरावे जमा करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग; दाेघांना सहा महिन्यांचा कारावास, लातूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालचा निकाल
राजकुमार जाेंधळे / लातूर : शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या दाेघा आरोपींना सहा महिन्याचा करावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी सुनावली.
पाेलिसांनी सांगितले, मुरुड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेला दाेन मुली जात असताना, खासगी शिकवणीला जाता-येताना सातत्याने दाेघांनी पाठलाग करत विनयभंग केला. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात २०२२ मध्ये अशोक शिवाजी अडसुळे (वय ३१) आणि बाळू उर्फ विजय भागवत लोहार (वय ३४, दाेघेही रा. बोरगाव काळे ता. लातूर) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला हाेता.
दरम्यान, लातूर ग्रामीणचे डीवायएसपी सुनील गोसावी, मुरुडचे सपोनि. अशोक उजगरे यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून आरोपीविराेधात सबळ पुरावे जमा करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने कलम ३५४ (ड) भादंविप्रमाणे दाेघा आरोपींना दोषी ठरवत सहा महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली आहे. या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रेमानंद डी. देडे यांनी युक्तिवाद केला.
ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणचे डीवायएसपी सुनील गोसावी, सपोनि. अशोक उजगरे, कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोउपनि. रोहन पाटील यांनी केली. त्यांना कोर्टपैरवी इम्रान शेख, प्रेमला सगर यांनी सहकार्य केले.