रेणापूर खून प्रकरणातील संशयिताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 19:01 IST2020-10-01T19:00:41+5:302020-10-01T19:01:14+5:30
रेणापूर तालुक्यातील २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या खून प्रकरणातील एका संशयिताला गुरूवारी गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रेणापूर खून प्रकरणातील संशयिताला अटक
लातूर : रेणापूर तालुक्यातील २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या खून प्रकरणातील एका संशयिताला गुरूवारी गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्रीकांत उर्फ बबलू आत्मलिंग चिल्लरगे या तरुणाचा डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. सदरची घटना लातूर शहरातील ग्रामदैवत श्री रत्नेश्वर- श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात घडली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत मयताचा भाऊ ओम चिल्लरगे याने दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत एका संशयिताला गुरुवारी ताब्यात घेतले. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात २४ तासात यश येईल. शिवाय, लवकरच खूनाचे कारणही पुढे येईल, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख यांनी सांगितले.