शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By राजकुमार जोंधळे | Updated: September 13, 2022 11:41 IST

रेणा धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.

रेणापूर ( जि. लातूर) : रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोमवारी सांयकाळच्या सुमारास धरणाचे पुन्हा दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दोन्ही दरवाजांमधून नदीपात्रात १७.७५ क्युमेक्स (६२६.७५ क्युसेक ) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडण्याची ही आठवी तर सप्टेबर २०२२ या महिन्यातील १२ दिवसात प्रकल्पाचे दरवाजे सहा वेळा उघडण्याची वेळ आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकूण १४ वेळा दरवाजे उघडून रेणा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, नदीकाठावरील शेतकरी आणि नागरिकांनी सर्तक राहवे, असे आवाहन रेणापूर येथील तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी केले आहे.

रेणा धरणाची पाणीपातळी सध्या ६०८.४६ मी (आरएल) एवढी आहे. रेणा धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीपात्रात कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. नदीकाठवर असलेल्या शेतकऱ्यांनी, नागरीकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे. 

पाटबंधारे विभाग लातूर क्रमांक ७ चे उपविभागीय अभियंता एस. एम. निटूरे, प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक एस. पी. डब्बे याच्यासह अन्य कर्मचारी रेणा मध्यम प्रकल्पावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी