शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

जळकोटात ७६ केंद्रांवर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:16 IST

उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संदीप कुलकर्णी व नायब तहसीलदार राजाराम खरात हे तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक यंत्रणा ...

उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संदीप कुलकर्णी व नायब तहसीलदार राजाराम खरात हे तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक यंत्रणा राबवीत आहेत. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी १० निवडणूक निर्णय अधिकारी व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ गावांत एकूण ७६ मतदान केंद्रे असून ४२७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १०० ईव्हीएम मशीनचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण झाले आहे.

सोमवारी (दि. ११) सर्वांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात मशीन सील करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. व्ही. काडवादे, व्ही. के. हांडे, पी. एस. शिंदे, आय. जे. गोलंदाज, जी. ए. त्रिपती, बी. ए. चिंचोले, व्ही. बी. धुळे; तर राखीव म्हणून डी. एम. घंटेवाड, आर. पी. भंडारे, ए. झेड. उस्ताद यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. व्ही. सूर्यवंशी, आर. डी. वारकड, एस. एस. लाखाडे, आर. एस. शिवपुरे, व्ही. एस. सुवर्णकार, जी. जी. लांडगे, जी. जी. सताळे, राखीव म्हणून एस. आर. कांबळे, एस. पी. पाटील, ए. एच. मोमीन यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

२०३ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद

तालुक्यातील तिरुका ग्रामपंचायत बिनविरोध निघाली असून उर्वरित २६ ग्रामपंचायतींच्या २०३ जागांसाठी २९ हजार ३४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष १६ हजार ९५१, तर महिला मतदार १५ हजार ४३ आहेत. निवडणूक विभागाकडून १० झोनल अधिकारी, ५५ वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली.

संवेदनशील केंद्रांवर चाेख बंदोबस्त...

मरसांगवी, अतनूर, हळद वाढवणा, वांजरवाडा, कुणकी, आदी गावांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये दोन डीवायएसपी, दोन पोलीस निरीक्षक, तीन पीएसआय, १४० पोलीस कर्मचारी व होमगार्डांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वच ठिकाणी करडी नजर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश सौंडारे यांनी दिली.