शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गुरुवारी लातूर शहरात पेट्राेल १०८ रुपये ८४ पैसे तर डिझेलचे दर ९६ रुपये ९६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : गुरुवारी लातूर शहरात पेट्राेल १०८ रुपये ८४ पैसे तर डिझेलचे दर ९६ रुपये ९६ पैशांवर होते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, विमानात वापरण्यात येणाऱ्या एटीएफ पेट्रोलचा दर ६६ रुपये प्रतिलीटरवर आहे. त्यामुळे विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग झाले असून, सर्वसामान्यांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच महागाईच्या भडक्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. शासनाने इंधनाची दरवाढ कमी करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

पगार कमी, खर्चात वाढ...

कोरोनामुळे पगार कपात झाली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा कमी पगार हाती येत आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे घर चालवावे कसे, हा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही दिवसात दर कमी न झाल्यास दुचाकीवर फिरणेही अवघड होणार आहे. दरवाढीमुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची गरज आहे. - चेतन हाके

गेल्या दीड वर्षांपासून व्यवहारांवर निर्बंध आले आहेत. महिन्याला येणारा पगारही पुरेनासा झाला आहे. मुलांचे शिक्षण, शाळांची फी, किराणा, दवाखाना या गोष्टींसाठी काटकसर करावी लागत आहे. मार्केटमध्ये सद्यस्थितीत सर्वच व्यवहार डबघाईला आले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वी ६०० ते ७०० रुपयांना मिळणारा गॅस ८६० रुपयांवर पोहोचला आहे तर पेट्रोल १०८ आणि डिझेल ९६ रुपयांवर गेले आहे. शासनाने यामध्ये निर्णय घेऊन सर्वसामान्यांवर असलेेले महागाईचे ओझे कमी करण्याची गरज आहे. - सचिन निंबोळकर

कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी हजार...

कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. जिथे पूर्वी ५०० रुपये लागायचे तिथे आज हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.

शहरातून गावाकडे जायचे म्हटले तर ४ लीटर पेट्रोल लागते. सरासरी ५०० रुपयांचा खर्च लागतो. मात्र, एस. टी. बसने गेल्यास केवळ २०० रुपये लागतात. त्यामुळे काहीजणांनी गावाकडे जाण्यासाठी बसचा आधार घेतला आहे.

कोरोनामुळे अर्थकारण कोलमडल्याने सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचे चित्र आहे.