शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांना टाळे लागले आहे. त्यामुळे भाविक-भक्तांना कळसाचेच दर्शन घ्यावे लागत आहे. गत मार्च ...

लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांना टाळे लागले आहे. त्यामुळे भाविक-भक्तांना कळसाचेच दर्शन घ्यावे लागत आहे. गत मार्च २०२०पासून टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आणि मंदिरांचे दार बंद झाले. तब्बल दीड वर्षापासून हे दार बंद ठेवण्यात आले असून, परिसरातील व्यापाऱ्यांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांचे अर्थचक्रच थांबले आहे. सध्या काही मंदिरात हाेणाऱ्या नित्यपूजेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भाविकांसाठी ही मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. ‘उघड दार देवा आता उघड दार देवा’ असेच म्हणण्याची वेळ भाविक-भक्तांवर आली आहे.

लातुरातील गंजगाेलाई, गांधी चाैक, गावभाग परिसर, बसस्थानक परिसरातील मंदिरांसह इतर ठिकाणच्या मंदिरांचे दार बंदच आहे. तर जिल्ह्यात सावरगाव, वडवळ नागनाथ, शिरुर ताजबंद, शिरुर अनंतपाळ, निलंगा, डाेंगरशेळकी, किनी यल्लादेवी- शेळगावसह इतर ठिकाणच्या मंदिरांची दारे सध्या भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. भाविकांनी गर्दी करु नये, यासाठी धार्मिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. आता अनलाॅकचा टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे मंदिरांचे दार कधी उघडणार, याकडेच भाविकांचे लक्ष लागले आहे.

किती दिवस कळसाचेच घ्यायचे दर्शन?

गत मार्चपासून ठिकठिकाणच्या मंदिरांचे दार बंद आहे. त्यामुळे आम्हाला कळसाचेच दर्शन घ्यावे लागत आहे. आता अजून किती दिवस हे दर्शन घ्यावे लागेल, असा प्रश्न भाविक-भक्तांमधून विचारला जात आहे. येथून जवळच असलेल्या तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकाेट आणि गाणगापूरलाही जाता आले नाही.

- पुंडलिक जाधव, भाविक

दरिदन मी गंजगाेलाईत देवीच्या दर्शनासाठी जाताे. सध्या बाहेरुनच देवीचे दर्शन घेऊन परत जावे लागते. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दार कधी उघडणार, याचीच प्रतीक्षा आता आम्हाला लागली आहे. मंदिराचे दारच बंद असल्याने कळसाचेच दर्शन घ्यावे लागत आहे.

- ज्ञानेश्वर सूर्यवंशी, भाविक

नियमांचे पालन करुन मंदिर उघडण्याची गरज

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मंदिरांचे दार बंद आहे. मात्र, आता अनलाॅकचा टप्पा सुरु झाला असून, सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. काेराेना नियमांचे पालन करुन मंदिर उघडण्याला परवानगी देण्याची गरज आहे. मंदिर उघडले तर अनेकांना यातून राेजगार मिळणार आहे. परिसरातील दुकानदारांची उपासमार सुरु झाली आहे.

व्यावसायिकांचे आर्थिक गणित काेलमडले

लाॅकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आणि मंदिराबराेबरच आमच्याही दुकानांना टाळे लागले. यातून दुकानभाडे आणि इतर खर्च कसा भागवायचा? हाच प्रश्न गत दीड वर्षांपासून आम्हाला सतावत आहे. यातून अर्थचक्रच ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

काेराेनाने मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानदारांवर माेठे संकट ओढवले आहे. गत काही महिन्यांपासून पदरमाेड करुन दुकान भाडे भरावे लागत आहे. यातून जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अजून किती दिवस हाेणारा आर्थिक ताेटा सहन करायचा, असा प्रश्न व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.