शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुखेडजवळ वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, १० जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST

हाळी येथील विनोद सोनकांबळे यांचा विवाह मंगळवारी कार्ला (ता. बिलोली) येथे होता. त्यामुळे वऱ्हाडी टेम्पोने जात होते. मुखेडपासून १० ...

हाळी येथील विनोद सोनकांबळे यांचा विवाह मंगळवारी कार्ला (ता. बिलोली) येथे होता. त्यामुळे वऱ्हाडी टेम्पोने जात होते. मुखेडपासून १० किमी अंतरावरील सलगरा गावाजवळ अचानक टेम्पो उलटला. हा अपघात पाहून ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यात प्रशांत जनार्धन सूर्यवंशी (२७, रा. हाळी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातात १० जण गंभीर असून त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. प्रदीप जनार्धन कांबळे (२८) व नरसिंग श्रावण मसुरे (३५, दोघेही रा. हाळी) हे गंभीर आहेत. किरकोळ जखमींना उदगीरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

अपघातात वच्छला सोनकांबळे, पूनम सोनकांबळे, प्रजापती मोरे, अर्चना सोनकांबळे, मणकर्णा गायकवाड, शांता सोनकांबळे, लक्ष्मीबाई गायकवाड, जयश्री सोनकांबळे, निर्गुणा मसुरे, वैजयंती गायकवाड, लक्ष्मीबाई कांबळे, नर्मदा सूर्यवंशी, जिजाबाई कांबळे, अजय सूर्यवंशी, भागिरथी कांबळे, प्रेमला मसुरे, राजाबाई गायकवाड, अजय जगताप, वर्षा सोनकांबळे, रिया सोनकांबळे, पंचशीला कांबळे, चक्रपाणी सोनकांबळे, विद्यासागर सोनकांबळे, सुकण्या गायकवाड, वनिता गायकवाड, सुनीता गायकवाड, शैलेश महालिंगे, गंगूबाई सोनकांबळे, उज्ज्वला सोनकांबळे, कमलबाई जगताप हे जखमी झाले आहेत.

मुलाच्या निधनामुळे कुटुंबात माता एकटीच...

या अपघातात प्रशांत सूर्यवंशी हा मयत झाला आहे. प्रशांत हा कुटुंबात एकटाच होता. तो दोन वर्षांचा असताना त्याच्या वडिलाचे निधन झाले होते. त्यामुळे आईनेच मोलमजुरी करून माहेरी त्याचा सांभाळ केला. तो एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.

घरानंतर विवाहाचे होते नियोजन...

प्रशांतच्या आईच्या नावे घरकुल मंजूर झाले होते. त्यामुळे उसनवारी करून घराचे बांधकाम करण्यात येत आहे. शेवटच्या टप्प्यात बांधकाम आहे. यंदा घराचे काम पूर्ण झाले की त्यानंतर विवाह करण्याचे त्याचे नियोजन होते. परंतु, दुर्दैवाने प्रशांतवर काळाने घाला घातला.

विवाह सोहळा रद्द...

विवाह समारंभासाठी दोन टेम्पो, दोन कार जात होत्या. नवरदेवाचे वाहन विवाहाचे गाव २० किमी अंतरावर होते. पण, पाठीमागील गाडी उलटल्याचे समजताच नवरदेवाने आपले वाहन परत आणले. त्यामुळे विवाह झाला नाही.