शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

निलंग्यात रस्त्यावरील खड्ड्यांतील माती न काढताच डागडुजीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST

निलंगा : शहरातून जाणाऱ्या लातूर- बीदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीचे ...

निलंगा : शहरातून जाणाऱ्या लातूर- बीदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु आहे. परंतु, खड्ड्यातील मातीही न काढता ही डागडुजी केली आहे. विशेष म्हणजे, शनिवार व रविवार हे दोन सुटीचे दिवस असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

लातूर- बीदर मार्ग शहरातून जातो. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतूक असते. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरुन अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात घडले आहेत. तसेच उसाचे भरलेले ट्रकही उलटले आहेत. त्यामुळे चार- पाच वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी वारंवार मागणी होत आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी संबंधित रस्त्याच्या डागडुजीसाठी २ कोटी ५० लाख मंजूर झाले. मात्र, संबंधित गुत्तेदाराने थातूरमातूर काम करुन ते थांबविले आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पांचाळ कॉलनीपर्यंत केवळ ६०० ते ८०० मीटर रस्त्याचे काम करून थांबविले.

शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम अन्य गुत्तेदारास मिळाले आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम दुतर्फा पूर्णही केले. मात्र, रस्त्यातील अनेक खड्डे अद्यापही जैसे थे आहेत. मोठे खड्डे बुजविताना त्यातील मातीही काढली नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

कामाची गुणवत्ता तपासावी...

सदरील काम हे योग्य पध्दतीने झाले नाही. त्यामुळे त्याची गुणवत्ता तपासून बिल अदा करण्यात यावे. चांगले काम न झाल्यास बिल रोखून पुन्हा काम करुन घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही.

यापूर्वीच्या कामाची चौकशी करा...

दोन वर्षांपूर्वी निलंगा ते खरोसा रोडवरील डागडुजीसाठी २ कोटी ५० लाख मंजूर झाले होते. सदरील काम पूर्ण झाले की नाही, त्याचीही चौकशी करण्यात यावी. तसेच गुणवत्ता तपासावी, अशी मागणी शिवसेनेचे ईश्वर पाटील यांनी केली.

***