शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

निलंग्यात रस्त्यावरील खड्ड्यांतील माती न काढताच डागडुजीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST

निलंगा : शहरातून जाणाऱ्या लातूर- बीदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीचे ...

निलंगा : शहरातून जाणाऱ्या लातूर- बीदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु आहे. परंतु, खड्ड्यातील मातीही न काढता ही डागडुजी केली आहे. विशेष म्हणजे, शनिवार व रविवार हे दोन सुटीचे दिवस असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

लातूर- बीदर मार्ग शहरातून जातो. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतूक असते. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरुन अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात घडले आहेत. तसेच उसाचे भरलेले ट्रकही उलटले आहेत. त्यामुळे चार- पाच वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी वारंवार मागणी होत आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी संबंधित रस्त्याच्या डागडुजीसाठी २ कोटी ५० लाख मंजूर झाले. मात्र, संबंधित गुत्तेदाराने थातूरमातूर काम करुन ते थांबविले आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पांचाळ कॉलनीपर्यंत केवळ ६०० ते ८०० मीटर रस्त्याचे काम करून थांबविले.

शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम अन्य गुत्तेदारास मिळाले आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम दुतर्फा पूर्णही केले. मात्र, रस्त्यातील अनेक खड्डे अद्यापही जैसे थे आहेत. मोठे खड्डे बुजविताना त्यातील मातीही काढली नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

कामाची गुणवत्ता तपासावी...

सदरील काम हे योग्य पध्दतीने झाले नाही. त्यामुळे त्याची गुणवत्ता तपासून बिल अदा करण्यात यावे. चांगले काम न झाल्यास बिल रोखून पुन्हा काम करुन घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही.

यापूर्वीच्या कामाची चौकशी करा...

दोन वर्षांपूर्वी निलंगा ते खरोसा रोडवरील डागडुजीसाठी २ कोटी ५० लाख मंजूर झाले होते. सदरील काम पूर्ण झाले की नाही, त्याचीही चौकशी करण्यात यावी. तसेच गुणवत्ता तपासावी, अशी मागणी शिवसेनेचे ईश्वर पाटील यांनी केली.

***