शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

निलंग्यात रस्त्यावरील खड्ड्यांतील माती न काढताच डागडुजीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST

निलंगा : शहरातून जाणाऱ्या लातूर- बीदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीचे ...

निलंगा : शहरातून जाणाऱ्या लातूर- बीदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु आहे. परंतु, खड्ड्यातील मातीही न काढता ही डागडुजी केली आहे. विशेष म्हणजे, शनिवार व रविवार हे दोन सुटीचे दिवस असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

लातूर- बीदर मार्ग शहरातून जातो. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतूक असते. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरुन अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात घडले आहेत. तसेच उसाचे भरलेले ट्रकही उलटले आहेत. त्यामुळे चार- पाच वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी वारंवार मागणी होत आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी संबंधित रस्त्याच्या डागडुजीसाठी २ कोटी ५० लाख मंजूर झाले. मात्र, संबंधित गुत्तेदाराने थातूरमातूर काम करुन ते थांबविले आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पांचाळ कॉलनीपर्यंत केवळ ६०० ते ८०० मीटर रस्त्याचे काम करून थांबविले.

शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम अन्य गुत्तेदारास मिळाले आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम दुतर्फा पूर्णही केले. मात्र, रस्त्यातील अनेक खड्डे अद्यापही जैसे थे आहेत. मोठे खड्डे बुजविताना त्यातील मातीही काढली नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

कामाची गुणवत्ता तपासावी...

सदरील काम हे योग्य पध्दतीने झाले नाही. त्यामुळे त्याची गुणवत्ता तपासून बिल अदा करण्यात यावे. चांगले काम न झाल्यास बिल रोखून पुन्हा काम करुन घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही.

यापूर्वीच्या कामाची चौकशी करा...

दोन वर्षांपूर्वी निलंगा ते खरोसा रोडवरील डागडुजीसाठी २ कोटी ५० लाख मंजूर झाले होते. सदरील काम पूर्ण झाले की नाही, त्याचीही चौकशी करण्यात यावी. तसेच गुणवत्ता तपासावी, अशी मागणी शिवसेनेचे ईश्वर पाटील यांनी केली.

***