शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Nagraj Manjule: "विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:28 IST

नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं. 

लातूर - सध्याच्या कळात प्रेम करणं म्हणजेच विद्रोह होय. आजचं वातावरण पाहिलं असता, भांडणं करायची गरजच नाही, कारण आपल्या आजुबाजूला सगळं तेच आहे. आरे ला कारे म्हणायला धाडस लागत नाही. प्रेम करायला, आरे म्हणणाऱ्यांसमोर नम्रता दाखवायला हिंमत लागते, असे म्हणत सैराट फेम दिग्दर्शक नागरा मंजुळे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्रोही या शब्दाची त्यांच्या नजरेतून बदलेली वाख्या मांडली. तसेच, झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं काम साहित्य संमेलनातून होतं, असेही ते म्हणाले.

उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर, अनेक दिग्गजांनी या साहित्य संमेलनात उपस्थिती लावली. नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं. 

आम्ही लहान असताना गावात झोपलेल्या लोकांना जागं करायला, जागता पहारा द्यायला गुरखा येत होती. म्हणजे आपल्या घरात चोरी होऊ नये, दरोडा पडू नये म्हणून झापलेल्या लोकांना जागं ठेवण्यात हे गुरखा महत्त्वाची भूमिका पार पाडत होती. आता, समाजात झोपलेल्या लोकांना जागं करण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. मात्र, विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय, असे म्हणत नागराज मंजुळे यांनी झोपलेल्या लोकांना जागं करायला पाहिजे, असे मत मांडले. 

मला वाटतं की, साहित्यिक, कलाकार आणि यांच्या कलेतील दरी कमी व्हायला पाहिजे. कारण, साहित्यिक हेही कलाकारच असतात. म्हणूनच, साहित्यिक आणि कलाकार यांच्यातील अंतर कमी करणारं हे साहित्य संमेलन आहे. कलात्मक पातळीवर माझं साहित्य, कविता, कला किती यशस्वी ठरते यात मला घेणंदेणं नाही. आपली कला, साहित्य, चित्रपट हे माणसाच्या आयुष्यात उतरतं की नाही, हे पाहणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. साहित्य संमेलनातून सर्वसामान्यांचा विचार व्हायला हवा, त्यांच्या जगण्यातील गोष्टींचा विचार व्हावा. ते जर माणसांच्या उपयोगाला आलं नाही, जगण्याला आलं नाही, तर ते किती थोरं होतं याचं मला काहीही घेणंदेणं वाटत नाही, अशा शब्दात नागराज मंजुळेंनी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन साहित्य आणि संमेलनावर परखड भाष्य केलं. 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळlaturलातूरcinemaसिनेमा