शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

Nagraj Manjule: "विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:28 IST

नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं. 

लातूर - सध्याच्या कळात प्रेम करणं म्हणजेच विद्रोह होय. आजचं वातावरण पाहिलं असता, भांडणं करायची गरजच नाही, कारण आपल्या आजुबाजूला सगळं तेच आहे. आरे ला कारे म्हणायला धाडस लागत नाही. प्रेम करायला, आरे म्हणणाऱ्यांसमोर नम्रता दाखवायला हिंमत लागते, असे म्हणत सैराट फेम दिग्दर्शक नागरा मंजुळे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्रोही या शब्दाची त्यांच्या नजरेतून बदलेली वाख्या मांडली. तसेच, झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं काम साहित्य संमेलनातून होतं, असेही ते म्हणाले.

उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर, अनेक दिग्गजांनी या साहित्य संमेलनात उपस्थिती लावली. नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं. 

आम्ही लहान असताना गावात झोपलेल्या लोकांना जागं करायला, जागता पहारा द्यायला गुरखा येत होती. म्हणजे आपल्या घरात चोरी होऊ नये, दरोडा पडू नये म्हणून झापलेल्या लोकांना जागं ठेवण्यात हे गुरखा महत्त्वाची भूमिका पार पाडत होती. आता, समाजात झोपलेल्या लोकांना जागं करण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. मात्र, विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय, असे म्हणत नागराज मंजुळे यांनी झोपलेल्या लोकांना जागं करायला पाहिजे, असे मत मांडले. 

मला वाटतं की, साहित्यिक, कलाकार आणि यांच्या कलेतील दरी कमी व्हायला पाहिजे. कारण, साहित्यिक हेही कलाकारच असतात. म्हणूनच, साहित्यिक आणि कलाकार यांच्यातील अंतर कमी करणारं हे साहित्य संमेलन आहे. कलात्मक पातळीवर माझं साहित्य, कविता, कला किती यशस्वी ठरते यात मला घेणंदेणं नाही. आपली कला, साहित्य, चित्रपट हे माणसाच्या आयुष्यात उतरतं की नाही, हे पाहणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. साहित्य संमेलनातून सर्वसामान्यांचा विचार व्हायला हवा, त्यांच्या जगण्यातील गोष्टींचा विचार व्हावा. ते जर माणसांच्या उपयोगाला आलं नाही, जगण्याला आलं नाही, तर ते किती थोरं होतं याचं मला काहीही घेणंदेणं वाटत नाही, अशा शब्दात नागराज मंजुळेंनी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन साहित्य आणि संमेलनावर परखड भाष्य केलं. 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळlaturलातूरcinemaसिनेमा