शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Nagraj Manjule: "विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:28 IST

नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं. 

लातूर - सध्याच्या कळात प्रेम करणं म्हणजेच विद्रोह होय. आजचं वातावरण पाहिलं असता, भांडणं करायची गरजच नाही, कारण आपल्या आजुबाजूला सगळं तेच आहे. आरे ला कारे म्हणायला धाडस लागत नाही. प्रेम करायला, आरे म्हणणाऱ्यांसमोर नम्रता दाखवायला हिंमत लागते, असे म्हणत सैराट फेम दिग्दर्शक नागरा मंजुळे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्रोही या शब्दाची त्यांच्या नजरेतून बदलेली वाख्या मांडली. तसेच, झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं काम साहित्य संमेलनातून होतं, असेही ते म्हणाले.

उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर, अनेक दिग्गजांनी या साहित्य संमेलनात उपस्थिती लावली. नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं. 

आम्ही लहान असताना गावात झोपलेल्या लोकांना जागं करायला, जागता पहारा द्यायला गुरखा येत होती. म्हणजे आपल्या घरात चोरी होऊ नये, दरोडा पडू नये म्हणून झापलेल्या लोकांना जागं ठेवण्यात हे गुरखा महत्त्वाची भूमिका पार पाडत होती. आता, समाजात झोपलेल्या लोकांना जागं करण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. मात्र, विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय, असे म्हणत नागराज मंजुळे यांनी झोपलेल्या लोकांना जागं करायला पाहिजे, असे मत मांडले. 

मला वाटतं की, साहित्यिक, कलाकार आणि यांच्या कलेतील दरी कमी व्हायला पाहिजे. कारण, साहित्यिक हेही कलाकारच असतात. म्हणूनच, साहित्यिक आणि कलाकार यांच्यातील अंतर कमी करणारं हे साहित्य संमेलन आहे. कलात्मक पातळीवर माझं साहित्य, कविता, कला किती यशस्वी ठरते यात मला घेणंदेणं नाही. आपली कला, साहित्य, चित्रपट हे माणसाच्या आयुष्यात उतरतं की नाही, हे पाहणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. साहित्य संमेलनातून सर्वसामान्यांचा विचार व्हायला हवा, त्यांच्या जगण्यातील गोष्टींचा विचार व्हावा. ते जर माणसांच्या उपयोगाला आलं नाही, जगण्याला आलं नाही, तर ते किती थोरं होतं याचं मला काहीही घेणंदेणं वाटत नाही, अशा शब्दात नागराज मंजुळेंनी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन साहित्य आणि संमेलनावर परखड भाष्य केलं. 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळlaturलातूरcinemaसिनेमा