शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात न्यूरोलॉजिकल थेरपीसाठी मोबाइल क्लिनिक पोहोचले अंगणवाडीत

By हरी मोकाशे | Updated: August 6, 2024 12:52 IST

लातूरात जिल्हा परिषद व ‘उमंग’चा देशातील पहिला ‘अनमाेल’ उपक्रम

लातूर : न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर व थेरपीसाठी मोनोबस मोबाइल क्लिनिक व थेरपी सेंटरचा देशातील पहिला ‘अनमोल’ उपक्रम लातूर जिल्हा परिषद व उमंग रिसर्च सेंटरने राबविला आहे. ज्याद्वारे प्रत्येक अंगणवाडीपर्यंत जाऊन मुलांची तपासणी व लवकर निदान शक्य झाले आहे.

लातूर जिल्हा परिषद आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान संचलित देशातील पहिले उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझम ॲण्ड मल्टिडिसॅबिलिटी रिसर्च सेंटर मागील काही वर्षांपासून लातूरमध्ये सुरू आहे. येथे मानसिक व शारीरिक दुर्बल बालकांसाठी सर्व प्रकारच्या न्यूरॉलॉजिकल तपासण्या, उपचार तसेच अर्ली इंटरवेन्शन, ॲक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, बिव्हेरियल थेरपी, रेमेडियल थेरपी, सेन्सरी इन्टिग्रेशन थेरपी, हायड्रो थेरपी, ओएई, ईईजी, बेरा, पीटीए उपचार पद्धती सुरू आहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनानुसार वन स्टॉप सोल्यूशन फॉर चाइल्ड ॲण्ड वूमन्स अंतर्गत ‘उमंग ऑन व्हिल्स’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीपर्यंत पोहोचविला जात आहे. मोनोबसचे परिवर्तन मोबाइल क्लिनिक व थेरपी सेंटरमध्ये करून न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आणि थेरपीसाठी रुग्णांच्या दारात जाणारे हे देशातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.

२५० पेक्षा अधिक मुलांना ऑटिझम विकार...‘उमंग ऑन व्हिल्स’च्या माध्यमातून ५० हून अधिक अंगणवाडी, १० खासगी पूर्वप्राथमिक इंग्रजी शाळांमधील ६ हजार ५०० हून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली. त्यात २५० पेक्षा जास्त मुलांना ऑटिझम आणि ऑटिझम स्पेक्ट्रम विकार असल्याचे निदान झाले. तसेच १५० पेक्षा अधिक मुले इतर न्यूरोलॉजिकल विकाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन महिन्यांपासून उपचार सेवा...ही उपचार सेवा दोन महिन्यांपासून सुरू आहे. लहान मुलांचे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत उटगे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने उपचार सेवेला गती दिली आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामपंचायतींची मदत मिळत आहे.

मुलांचा दिव्यांग होण्यापासून बचाव...‘उमंग ऑन व्हिल्स’च्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रापर्यंत जाऊन बालकांची मानसिक तपासणी करण्यात येत आहे. वेळीच तपासणीमुळे लवकर निदान होईल व तत्काळ उपचार केल्यामुळे मुलांना दिव्यांग होण्यापासून वाचवता येईल. त्यामुळे मुलांची शारीरिक, मानसिक प्रगती होण्याबरोबरच बुद्धिमत्ताही वाढेल.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षणHealthआरोग्य