शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या तीन पटीने देवेंद्र फडणवीस सरकारचे काम; अमित शहांचा शरद पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 20:07 IST

भाजपा सरकारने केलेली विकासकामे विरोधकांच्या ५० वर्षे राजवटीपेक्षाही सरस आहेत. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले.

तुळजापूर: भाजपा सरकारने केलेली विकासकामे विरोधकांच्या ५० वर्षे राजवटीपेक्षाही सरस आहेत. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले. त्यांच्यापेक्षा तीन पट कामे देवेंद्र फडणवीस सरकारने करून दाखविली. तुम्ही फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलत राहिलात, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी प्रचारसभेत लगावला.

भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री शहा यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर व लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे सभा झाली. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसचे लोक देश एकसंघ ठेवू शकत नाहीत. त्यांनी १५ वर्षे भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला. त्यामुळे ते विकासाच्या मुद्यावर आमच्यासमोर टिकू शकत नाहीत. भाजपा सरकारने मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली.  राज्यातील पहिली रेल्वे कोच फॅक्टरी लातूरला होत आहे. एकट्या लातूर जिल्ह्यात २ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपये मदत मिळाली आहे. ३३ हजार वीज कनेक्शन, ४२ हजार गॅस कनेक्शन दिले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकांना मिळाला. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विरोधाला मुद्दाच नाही.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पराभवानंतर परदेश दौरे करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीत घराणेशाहीचा जयघोष आहे. अजित पवार जलसंपदा मंत्री होते, त्यांनी पाण्याचा एक थेंबही शेतकºयांना मिळेल असे काम केलेले नाही. आम्ही ९ हजार कोटी खर्चून १८ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविली. काँग्रेस आघाडीत मात्र भ्रष्टाचार शिष्टाचार झाला. त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाच वर्षे टिकले नाहीत. आम्ही पाच वर्षे सक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त नेतृत्व दिले.

इंदिरा गांधी यांच्या युद्धाच्या निर्णयाचे जनसंघाने स्वागत केले होते याची आठवण करून देत गृहमंत्री शहा म्हणाले, कलम ३७०, सर्जिकल स्ट्राईक आम्ही केले. मात्र राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. ३७० वर काँग्रेस सहमत आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे. ३७० हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, राफेलच्या पूजेवरून सुरू झालेल्या टिकेला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, दसºयाला आपण शस्त्रांचे पूजन करतो. राफेल हे आपले शस्त्र आहे, त्याचे पूजन केले तर बिघडले काय. मंचावर निलंग्याचे उमेदवार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, खा. ओमराजे निंबाळकर, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, औश्याचे उमेदवार अभिमन्यू पवार, आ. सुधाकर भालेराव उपस्थित होते.

चून चूनकर बाहर निकालेंगे...

काँग्रेस नेहमीच देशहिताच्या गोष्टींना विरोध करते. पण एकदा का एनआरसी लागू झाली की, मग या देशात अनधिकृतपणे राहणाºयांना ‘हम चून चूनकर बाहर निकालेंगे’ असा इशाराही अमित शहा यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Amit Shahअमित शहाlatur-city-acलातूर शहरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवार