शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लातुरात एकाने पेट्रोल ओतून घेतले, शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 19:17 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

 लातूर - औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. हॉटेल, टपरी, शाळा-महाविद्यालये बंद होती. एस.टी.ही रस्त्यावरून धावली नाही. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गटा-गटाने मोटारसायकलवर फिरून बंदचे आवाहन करीत होते. दरम्यान, शिवाजी चौकात एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. औसा येथे पंढरपूरहून आलेल्या एका बसवर दगडफेक झाली असून, सिरसल येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जळकोट तालुक्यातील घोणसी येथेही रास्ता रोको आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. उदगीर येथे तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. रेणापूर येथील पिंपळफाटा, खरोळा येथे आंदोलनकर्त्यांनी काही वेळ रास्ता रोको केला. लातूर शहरातील शिवाजी चौकात अमोल जगताप या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. तसेच शहरात एक रुग्णालय, एक हॉटेल आणि दोन व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक झाली. शिवाय, प्रवासी वाहतूक करणाºया चार वाहनांवरही औसा रोड, रेणापूर नाका आणि विवेकानंद चौक परिसरात दगडफेक झाली. शिक्षण उपसंचालकांना घेराव... ५० टक्के शैक्षणिक सवलतींचा शासन अध्यादेश दाखवा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांना घेराव घातला. दरम्यान, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी असा कोणताही शासन अध्यादेश नसल्याचे आंदोलकांना सांगितले व त्याची लेखीही दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. एकही बस धावली नाही... लातूर, उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि औसा आगारांतून मंगळवारी एकही बस धावली नाही. सकाळी ७ वाजेपासून बंद आंदोलनाला सुरुवात झाल्याने एस.टी. प्रशासनाने बस न सोडण्याचा निर्णय घेतला होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बसेस बंद होत्या.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदnewsबातम्या