शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

लातुरात एकाने पेट्रोल ओतून घेतले, शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 19:17 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

 लातूर - औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. हॉटेल, टपरी, शाळा-महाविद्यालये बंद होती. एस.टी.ही रस्त्यावरून धावली नाही. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गटा-गटाने मोटारसायकलवर फिरून बंदचे आवाहन करीत होते. दरम्यान, शिवाजी चौकात एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. औसा येथे पंढरपूरहून आलेल्या एका बसवर दगडफेक झाली असून, सिरसल येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जळकोट तालुक्यातील घोणसी येथेही रास्ता रोको आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. उदगीर येथे तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. रेणापूर येथील पिंपळफाटा, खरोळा येथे आंदोलनकर्त्यांनी काही वेळ रास्ता रोको केला. लातूर शहरातील शिवाजी चौकात अमोल जगताप या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. तसेच शहरात एक रुग्णालय, एक हॉटेल आणि दोन व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक झाली. शिवाय, प्रवासी वाहतूक करणाºया चार वाहनांवरही औसा रोड, रेणापूर नाका आणि विवेकानंद चौक परिसरात दगडफेक झाली. शिक्षण उपसंचालकांना घेराव... ५० टक्के शैक्षणिक सवलतींचा शासन अध्यादेश दाखवा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांना घेराव घातला. दरम्यान, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी असा कोणताही शासन अध्यादेश नसल्याचे आंदोलकांना सांगितले व त्याची लेखीही दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. एकही बस धावली नाही... लातूर, उदगीर, निलंगा, अहमदपूर आणि औसा आगारांतून मंगळवारी एकही बस धावली नाही. सकाळी ७ वाजेपासून बंद आंदोलनाला सुरुवात झाल्याने एस.टी. प्रशासनाने बस न सोडण्याचा निर्णय घेतला होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बसेस बंद होत्या.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदnewsबातम्या