शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

"तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो"; अजित पवारांवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:15 IST

अंबाजोगाई येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी खा. सुप्रिया सुळे गुरुवारी सकाळी लातूरमार्गे आल्या होत्या

मुंबई/लातूर - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन अद्यापही संभ्रम आहे. दोन्ही गटांकडून सातत्याने वेगवेगळी विधानं केली जातात. त्यामुळे, अजित पवार पुन्हा स्वगृहीत म्हणजे शरद पवारांसमवेतच्या राष्ट्रवादीत परत येतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असल्याचं म्हटलं. 

अंबाजोगाई येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी खा. सुप्रिया सुळे गुरुवारी सकाळी लातूरमार्गे आल्या होत्या. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या परत येण्याबद्दल सूचक विधान केलं. अजित पवार राष्ट्रवादीत शरद पवारांसोबत येतील का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, "तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो..,आता दोन भाऊ वेगळ्या रो हाऊसमध्ये राहतात, मध्ये फक्त कंपाऊंड आहे, " असे सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलं. तसेच, "ही वैचारिक लढाई आहे, निवडणुकीच्या वेळी ती राजकीय लढाई होईल. राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत," असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

फडणवीसांनी आमच्या घरासमोर आश्वासन दिले होते

राज्यात दुष्काळ आहे. चारा पाण्याची सोय नाही. पाऊस झाला नसल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये टंचाई आहे. यावर शासनाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीत. शिवाय, वेगवेगळ्या समाजाच्या मागण्यांवरही सरकार गंभीर नाही. मराठा समाजासह लिंगायत, मुस्लिम, धनगर या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन बारामती येथे आमच्या घरासमोर सभा घेऊन दिले होते. त्यांना त्याचा विसर पडला आहे. जालना जिल्ह्यात तर आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरच पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. 

विशेष अधिवेशन बोलवावे

आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नाही. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील आहे. मात्र, शासनाकडे धोरण नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस