शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर : डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आयातीला परवानगी दिली. त्यामुळे मागील आठवड्यापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उदगीर : डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आयातीला परवानगी दिली. त्यामुळे मागील आठवड्यापासून दरात घसरण होत असल्याचे उदगीर बाजार समितीत शनिवार व रविवारी दिसून आले. शनिवारच्या सौद्यात हरभऱ्याला प्रति क्विंटलमागे हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी मिळाले, तर सोयाबीन व तुरीच्या दरातही घसरण झाली. खरिपाच्या तोंडावर शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, सौद्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांकडे व्यापाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे.

सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या मार्केट यार्डात शेतमालाची आवक वाढली आहे. मागील महिन्यात हरभरा ५ हजार ३०० रुपये, सोयाबीन ७ हजार ७०० रुपये तर तुरीचा प्रतिक्विंटल दर ७ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. हवामान खात्याने यावर्षी सर्वसाधारण पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. जून महिना तोंडावर आल्याने पेरणीच्या खर्चासाठी शेतकरी आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, केंद्र सरकारने डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याचे कारण देत विदेशातून आयातीला परवानगी दिली. त्यामुळे हरभऱ्याचे दर ५०० रुपये तर तूर व सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हमीभाव खरेदी केंद्र २५ मेपर्यंत सुरु ठेवण्याची मुदत असल्याने किमान हमीभाव केंद्राला सरकारने मुदतवाढ द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

तीन राज्यांच्या सीमेवरील असलेल्या उदगीरच्या मार्केट यार्डात नांदेड जिल्ह्यातील काही गावांतून शेतमालाची आवक होत आहे. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने शहरातील सर्वच बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम लागू करुन बाजार समितीतील व्यवहाराला परवानगी दिली आहे. त्यावर पालिकेने लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे. परंतु, येथील मोढ्यांत कुठलेही नियम पाळले जात नाहीत. व्यापाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सकाळी सौद्यावेळी अक्षरशः यात्रेसारखी गर्दी दिसते. याकडे बाजार समितीने लक्ष देण्याची गरज आहे. ज्यामुळे बाहेरगावाहून शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह बाजारातील अन्य घटकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.

मास्कचा वापर करुन व्यवहार...

दररोज सकाळी ११ वाजता सौदा निघतो. काहीही केल्यास तासभर सौद्यात गर्दी होतेच. ती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मात्र, फारसा उपयोग होत नाही. परंतु, प्रत्येकजण चेहऱ्याला मास्क लावूनच व्यवहार करतो.

- संभाजी घोगरे, अध्यक्ष, आडत असोसिएशन.

व्यापाऱ्यांना वारंवार सूचना...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी सतत प्रयत्न करत आहेत. परंतु, व्यापारी ऐकत नाहीत. त्यासाठी मंगळवारपासून काही नवीन भूमिका घेतली जाईल.

- एन. डी. हंगरगे, प्रभारी सचिव.