शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

लातूर आरटीओच्या घरपोच सेवेचा उडाला बोजवारा; वाहनधारकांची सोय कमी मनस्तापच जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 19:01 IST

लातुर आरटीओच्या 'घरपोच सेवे'ने सोय कमी मनस्तापच जास्त 

ठळक मुद्देआरसी बुक, वाहन परवान्यासाठी वाहनधारकांचे खेटेवर्षभरात ७०० आरसीबुक परत 

- आशपाक पठाण

लातूर : प्रादेशिक परिहवन विभागाने सर्वच सेवा ऑनलाईन केल्या आहेत़ गेल्या काही वर्षांपासून वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र असो की वाहन परवाना अशी बहुतांश कागदपत्रे घरपोच दिली जात आहेत़ मात्र,  या घरपोच सेवेमुळे हजारो वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शिवाय, सर्वच वाहनांचे आरसी बुक (वाहनांचे नोंदणी पत्र) सहा सहा महिने मिळत नसल्याची ओरड आहे़ वर्षभरात ७०० जणांचे पत्र परत आली आहेत़

वाहनांची नोंदणी केल्यावर किमान आठ ते दहा दिवसांत संबंधित मालकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे़ शासनाने वाहन परवाना, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्याची योजना सुरू करून संबंधितांचे कार्यालयातील खेटे कमी करण्याचा प्रयत्न केला़  मात्र, मागील वर्षभरापासून घरपोच सेवेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ नागरिकांना घरपोच कागदपत्रे देण्यासाठी ५० रुपए शुल्क घेतला जातो़ लायसन्स किंवा आरसी बुक तयार झाल्यावर आरटीओ कार्यालयातून  पोस्टाकडे पाठविले जाते़ तद्नंतर त्याचा प्रवास सुरू झाला की जवळपास ८० ते ९० किलोमीटरच्या वर्तुळात संबंधित मालकाच्या घरी कागदपत्रे जायला चार चार महिने लागत आहेत़ वाहन परवान्याचा प्रवासही दोन महिन्यांपेक्षा कमी होत नसल्याने अनेकांना घरपोच सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ दुचाकी, आॅटोरिक्षा, कार, अन्य व्यावसायिक वाहनधारकांना वेळेत कागदपत्रे मिळत नसल्याने व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले़ आरटीओ कार्यालय परिसरात ड्रायव्हिंग स्कुल चालकांसोबतही वादाच्या घटना नेहमीच होत आहेत़ त्यामुळे घरपोच सेवेपेक्षा जुनीच पध्दत बरी होती, अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे़ 

हाय सेक्युरिटी ‘प्लेट’मुळे डोकेदुखी़नवीन वाहनांची नोंदणी झाल्यावर सदरील वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसविल्या जात आहेत़ यासाठी वाहन खरेदी करतानाच त्या प्लेटचे पैसे डिलरकडून भरून घेतले जातात़ मात्र, एकदा वाहनांची पासिंग झाली की वाहन मालकांना आरसी बुकसाठी आरटीओ कार्यालय तर नंबर प्लेटसाठी डिलरच्या दारात खेटे मारावे लागतात़  यातून नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ याकडे कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ 

नंबरप्लेट घेतल्यावर होते नोंदणीहाय सेक्युरिटी नंबरप्लेटमुळे वेळ लागत आहे़ वाहनांची पासिंग झाली की नंबर दिला जातो़ जोपर्यंत संबंधित वाहनमालक नंबरप्लेट घेऊन जाणार नाही, तोपर्यंत आॅनलाईन नोंद पूर्ण होत नाही़ आमच्याकडे आरसी बुक तयार करून पोस्टाने पाठविले जातात़ शहरी भागातील वाहनधारकांना ते लवकर मिळतात़ मात्र, ग्रामीण भागात पोस्टामुळे वेळ जातो़ घरचा पत्ता व्यवस्थित नसल्याने  ज्यांचे आरसीबुक, लायसन्स परत आले त्यांना ५० रुपए शुल्क भरून घेऊन कार्यालयात हातात दिले आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसlaturलातूरbikeबाईक