शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

लातूर आरटीओच्या घरपोच सेवेचा उडाला बोजवारा; वाहनधारकांची सोय कमी मनस्तापच जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 19:01 IST

लातुर आरटीओच्या 'घरपोच सेवे'ने सोय कमी मनस्तापच जास्त 

ठळक मुद्देआरसी बुक, वाहन परवान्यासाठी वाहनधारकांचे खेटेवर्षभरात ७०० आरसीबुक परत 

- आशपाक पठाण

लातूर : प्रादेशिक परिहवन विभागाने सर्वच सेवा ऑनलाईन केल्या आहेत़ गेल्या काही वर्षांपासून वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र असो की वाहन परवाना अशी बहुतांश कागदपत्रे घरपोच दिली जात आहेत़ मात्र,  या घरपोच सेवेमुळे हजारो वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शिवाय, सर्वच वाहनांचे आरसी बुक (वाहनांचे नोंदणी पत्र) सहा सहा महिने मिळत नसल्याची ओरड आहे़ वर्षभरात ७०० जणांचे पत्र परत आली आहेत़

वाहनांची नोंदणी केल्यावर किमान आठ ते दहा दिवसांत संबंधित मालकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे़ शासनाने वाहन परवाना, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्याची योजना सुरू करून संबंधितांचे कार्यालयातील खेटे कमी करण्याचा प्रयत्न केला़  मात्र, मागील वर्षभरापासून घरपोच सेवेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ नागरिकांना घरपोच कागदपत्रे देण्यासाठी ५० रुपए शुल्क घेतला जातो़ लायसन्स किंवा आरसी बुक तयार झाल्यावर आरटीओ कार्यालयातून  पोस्टाकडे पाठविले जाते़ तद्नंतर त्याचा प्रवास सुरू झाला की जवळपास ८० ते ९० किलोमीटरच्या वर्तुळात संबंधित मालकाच्या घरी कागदपत्रे जायला चार चार महिने लागत आहेत़ वाहन परवान्याचा प्रवासही दोन महिन्यांपेक्षा कमी होत नसल्याने अनेकांना घरपोच सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ दुचाकी, आॅटोरिक्षा, कार, अन्य व्यावसायिक वाहनधारकांना वेळेत कागदपत्रे मिळत नसल्याने व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले़ आरटीओ कार्यालय परिसरात ड्रायव्हिंग स्कुल चालकांसोबतही वादाच्या घटना नेहमीच होत आहेत़ त्यामुळे घरपोच सेवेपेक्षा जुनीच पध्दत बरी होती, अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे़ 

हाय सेक्युरिटी ‘प्लेट’मुळे डोकेदुखी़नवीन वाहनांची नोंदणी झाल्यावर सदरील वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसविल्या जात आहेत़ यासाठी वाहन खरेदी करतानाच त्या प्लेटचे पैसे डिलरकडून भरून घेतले जातात़ मात्र, एकदा वाहनांची पासिंग झाली की वाहन मालकांना आरसी बुकसाठी आरटीओ कार्यालय तर नंबर प्लेटसाठी डिलरच्या दारात खेटे मारावे लागतात़  यातून नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ याकडे कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ 

नंबरप्लेट घेतल्यावर होते नोंदणीहाय सेक्युरिटी नंबरप्लेटमुळे वेळ लागत आहे़ वाहनांची पासिंग झाली की नंबर दिला जातो़ जोपर्यंत संबंधित वाहनमालक नंबरप्लेट घेऊन जाणार नाही, तोपर्यंत आॅनलाईन नोंद पूर्ण होत नाही़ आमच्याकडे आरसी बुक तयार करून पोस्टाने पाठविले जातात़ शहरी भागातील वाहनधारकांना ते लवकर मिळतात़ मात्र, ग्रामीण भागात पोस्टामुळे वेळ जातो़ घरचा पत्ता व्यवस्थित नसल्याने  ज्यांचे आरसीबुक, लायसन्स परत आले त्यांना ५० रुपए शुल्क भरून घेऊन कार्यालयात हातात दिले आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसlaturलातूरbikeबाईक