शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

लातूर-निलंगा महामार्ग ठरताेय मृत्यूचा सापळा! वर्षभरात ६२५ अपघात; ३०५ ठार तर २५५ जण गंभीर जखमी

By राजकुमार जोंधळे | Updated: March 27, 2023 20:47 IST

जिल्ह्यात लातूर-औसा, औसा-निलंगा-औराद शहाजानी, लातूर-नांदेड, शिरूर ताजबंद-निजामाबाद, लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर हे अपघात झाले आहेत. यात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

लातूर : जिल्ह्यात वर्षभरात विविध मार्गावर ६२५ अपघात झाले आहेत. यात ३०५ जणांचा बळी गेला असून, २५५ जण जखमी झाले आहेत. दिवसेंदिवस अपघात आणि मृतांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. जिल्ह्यात लातूर-औसा, औसा-निलंगा-औराद शहाजानी, लातूर-नांदेड, शिरूर ताजबंद-निजामाबाद, लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर हे अपघात झाले आहेत. यात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

एकाच आठवड्यात लातूर-निलंगा-औराद शहाजानी महामार्गावर माेठे दाेन अपघात झाले. यात तब्बल ८ जण ठार झाले आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे अपघात झाल्याचे प्राथमिक चाैकशीत समाेर आले आहे. लातूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या नव्या महामार्गावर आता अपघाताच्या घटना माेठ्या प्रमाणावर घडत आहेत. महामार्ग आणि रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे वाहनांचा वेगही अमर्याद झाला आहे. अनेक वाहनचालकांच्या जिवावर हयगय अन् निष्काळजीपणा बेतला आहे. लातूर जिल्ह्यात काही भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही भागांत दुरुस्ती केली आहे. परिणामी, वाहनांचा वेग वाढला आहे. सर्वाधिक वाहन अपघात दुचाकी, चारचाकी कार, जीपचे झाले आहेत.

वाहनांचा अमर्याद वेग नडला; अपघातात नाहक जीव गेला! -भरधाव वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे, वाहनावरचा ताबा सुटणे, ओव्हरटेक करणे अशा अनेक कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. २०२१ मधील अपघाताची आकडेवारी, त्यातील मृत्यूची संख्या चिंताजनक आहे. ज्येष्ठांपेक्षा तरुणांची संख्याच यामध्ये अधिक आहे. ‘वाहनांचा अमर्याद वेग अनेकांना नडला अन् अपघातात नाहक जीव गेला...’ अशी स्थिती अपघातग्रस्तांची आहे.

अख्खे कुटुंबच झाले उद्ध्वस्त... -गत वर्षभरात झालेल्या अपघातात काहींचे अख्खे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण ६२५ अपघातात ३०५ ठार, तर २५५ गंभीर जमखी झाले आहेत. या अपघाताने अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अनेकांचे अख्खे कुटुंबच संपले आहे.

वाहन चालविताना अशी घ्या काळजी... -१) वाहतूक नियमांचे पालन करावे.२) वेगमर्यादेचे उल्लंघन करु नका.३) वाहन चालविताना सीटबेल्ट लावा.४) शक्यताे माेबाइलवर बाेलू नका.५) सतत वेगावर नियंत्रण ठेवावे.६) मद्यप्राशन करून गाडी चालवू नका.

आरटीओच्या पाहणीत आढळले २७ ब्लॅक स्पाॅट... -लातूरच्या आरटीओ विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात राज्य आणि महामार्गावर एकूण २७ ब्लॅक स्पाॅट आढळून आले आहेत. याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ते ब्लॅक स्पाॅट दूर करण्यासाठी सार्वजिनक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. हे ब्लॅक स्पाॅट दूर झाले तर अपघाताच्या घटनांत घट होतील.   - आशुताेष बारकूल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर

अन् आकडे बाेलतात... २०२२ मध्ये झालेले अपघात... -

प्रकार               अपघात        मृत्यू

पादचारी              १४२           ६६दुचाकी                ३३३          १६२ऑटाेरिक्षा             २१           १३कार                    ११७          ५२ट्रक                     १२            १२सायकल               ००            ००एकूण                  ६२५          ३०५ 

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर