शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

लातूरला अवकाळी पावसाने झोडपले; टरबूज, पपई, भाजीपाल्याची प्रचंड नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 4:22 PM

लातूर तालुक्यातील सारसा शिवारात वादळी वारा, गारांचा पाऊस

ठळक मुद्देबहरात आलेले पीक गेलेपंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लातूर : लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्याही लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. मुलांप्रमाणे सांभाळ केलेला भाजीपाला, टरबूज, पपई आदी पिके एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. वादळी वारा वरून गारांचा मार बसल्याने झाडांची पानेही गळून पडली. त्यामुळे लातूर तालुक्यातील सारसा शिवारातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

लातूर तालुक्यातील तांदुळजा गादवड टाकळगाव सारसा वांजरखेडा शिवारात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बनीमीही उडून गेले आहेत शिवाय अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असतानाही कमी पाण्यावर का होईना जोपासलेला भाजीपाला, टरबूज, पपई आदी फळांची नासाडी झाली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या वादळी वारा व गारांच्या झपाट्यात उसाची पाने गळून पडली. टरबूजावर गारांचा मारा बसल्याने अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत. पहिल्यांदाच एवढे मोठे वादळ आणि गारा पडल्याचे शेतकरी परमेश्वर भिसे, श्रीधर पवार, फक्रोद्दीन सय्यद,जमाल पठाण, महादेव भिसे, सुशील पवार यांनी सांगितले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. रात्री झालेल्या वादळात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मिळताच त्यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार स्वप्नील पवार यांच्या सूचनेनुसार तलाठी व कृषी सहाय्यक यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा सुरू केला असल्याचे मंडळ अधिकारी निजामुद्दीन शेख यांनी सांगितले. 

भाजीपाला, फळांचे 5 लाखांचे नुकसान... सारसा येथील प्रगतशील शेतकरी परमेश्वर भिसे म्हणाले, जवळपास पाच एकर क्षेत्रात पपई, टरबूज, काकडी, वांगे, भेंडी आदी फळे आणि भाजीपाल्याची लागवड केली होती. अगोदरच लॉकडॉउनमुळे लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले होते. रविवारी रात्री झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. यातून किमान 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बहरात आलेल्या टरबूजाचा चिखल... मांजरा नदीकाठी महिनाभरापूर्वी जमाल पठाण, आफसाना शेख यांनी जवळपास दोन एकर क्षेत्रात टरबूज लागवड केली. आणखीन 10 ते 15 दिवसात ते तोडणीला आले असते. लागवड व मशागतीचा आतापर्यंत 70 हजार रुपये खर्च झाला.गारपिटीने रात्रीत सर्वच नुकसान झाले. आता फड मोडल्याशिवाय पर्याय नाही. गारामुळे सर्व टरबूज फुटली आहेत. किमान दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. 

साहेब आमचाही पंचनामा करा... शिवारात पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठी, कृषी सहायक यांनी नुकसानीची पाहणी करीत पंचनामा केला. गारपीटीत उसाचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही पंचनाम्यासाठी महसुलाच्या कर्मचाऱ्यांना विनवणी केली. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी